Tuesday, January 5, 2016

Bindu Jodatana (All in One)... Dr Avinash Landge (Sangati)

पिंपळाच्या झाडाकडे जाताना .....
लेखनाची एक वेगळीच मजा आहे. आपण जर का ठरवले आज लिहुयात तर नाहीच सुचत काही. खूप वेळा खूप घाईच्या वेळी, निवांत क्षणी काही बाही सुचून जाते जे खरच लिहावेसे वाटते .... नेहमीप्रमाणे आळस करत लिहू कधीतरी असे म्हणून तो विषय बाजूला पडतो आणि ... बाजूलाच पडतो. असे कित्येक विषय आतापर्यंत सुचलेत आणि बाजूला पडून गेलेत. त्यामागेही एक कारणमीमांसा आहे म्हणा.... म्हणजे प्रत्येक गोष किती प्रोडक्टीव आहे... ती गोष केल्याने नफा किती वगैरे ने सुरुवात होते आणि मग सुचलेले विचार आल्या पावली परत फिरतात. बघू कधीतरी नंतर असा विचार करून आतल्या आत कुढत बसतात. बाहेर पडायचे असते त्यांना पण .....
खरे तर एवढे सगळे लिहून कोणी वाचेल का? किंवा वाचलेच तर त्याचा किती उपयोग होईल असे प्रश्न असतात मनात. दरम्यानच्या काळात आपण स्वताच्याही कोशात अडकत जातो, हेही तितकेच खरे. तर लिहण्यासाठी एक फ्लो हवासतो असे म्हणतात. विचार करून ठरवून कधीच लिहिता येत नाही.  अगदी खरंय हे ....
एफ. वाय. बि. एस्सी. ला Admission घेतले गेले होते. वसतिगृह आणि जेवण च्यकाटफू असल्याने खर्चचा काही विषयच नव्हता. खर्च तो काय महिन्याभरासाठी  एक साबण खोबरेल तेलाची एक बाटली टूथपेस्ट आणि टूथब्रश. चहा पिनासाठी पैसे लागत पण college ला त्यावेळी canteen नव्हते व गावापासून college ४ कि.मी. लांब असल्याने फक्त चहा पिण्यासाठी ४ कि. मी. पायी जाणे परवडणारे नव्हते. कारण सायकल कोणाकडेच नव्हती. तशी कधीतरी सकाळी (बहुदा रविवारी) आमची टी partyअसायची. आमच्यापैकी बहुतेक जन पुणे विद्यापीठ पुरस्कृत कामाव व शिका योजनेत काम करत असू. त्या काम करणाऱ्यामध्ये मीही एक होतो. महाविद्यालयाच्या परिसरातील गावात कापण्याचे काम आम्ही करत असू. १० रु. तास प्रमाणे आम्हाला पैसे मिळत असत. रोजचे दोन तास काम म्हणजे २० रु मिळत ...अशा प्रकारे महिन्याचे कमी अधिक ६०० रु मिळत असत. त्यामानाने आम्ही खूप श्रीमंत होतो. बरोबर ना! ... ना खानावळीचा खर्च, ना वसतिगृहाची फी, कसलाच खर्च नाही. चक्क पैसे शिल्लक पडत! म्हणून मग रविवारी चहा partyपार्टी करत असू. अगदी दहा मित्र घेऊन गेलो तरी बिल १५ रु. झाली partyपार्टी...... अर्थातच पार्टीचा टर्न दोन महिन्यातून एकदा यायचा. म्हणजे दोन महिन्यातून १२०० रु पैकी १५ रु पार्टीसाठी बाकी किरकोळ खर्च (बुरुडशेठची जिलेबी) महिना ५०० रु मागे पडत. बचत करत होतो आम्ही! दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेतून झालेली जादान्घादानाही खूप कामी आली. पैशामुळे शिक्षण कधीच थांबत नाही.... फक्त शिकण्याची जिद्द असली पाहिजे याच प्रत्यय पदोपदी येत होता. राष्ट्रीय सेवा योजनेतील अनुभवांबद्दल नन्तर लिहील कधीतरी. असाही तो एक स्वतंत्र प्रकरणाचा विषय आहे. ... वसतिगृहात जाऊन बरेच दिवस झाले होते. आतापावेतो आमची मैत्रीही चांगली बहरली होती. सुरुवातीला वसतिगृहात राहत असताना मी बराच बुजरा होतो. घाईघाई कोणाबरोबर बोलणे मला जमले नाही. पण निसर्गातच गोंडस रूप मिळाल्यामुळे माझ्याबद्दल बहुतेकांना स्नेह वाटे. त्यामुळेच वसतिगृहात सगळ्यात जास्त माझे मित्र बनले. बसतीगृहात स्वयंपाक करण्यासाठी दोन बायका होत्या त्यांना आम्ही मावशी म्हणत असे. त्यांना पण मी खूप जवळचा वाटे. शक्यतो संपूर्ण स्वयंपाक झाल्याशिवाय कोणाल जेवायला मिळत नसे पण मला तो मान कधी कधी मिळत असे. किती गम्मत बघा या सर्व विद्यार्थ्यामध्ये मला वेगळी treattment मिळायची तरी किती भारी वाटायचे ..... आपण उगाचच खूप श्रीमंत असल्यासारखे वाटायचे. खरच होते कि ते! त्या स्वयंपाक करणाऱ्या मावश्यांच्या प्रेमाची श्रीमंती होती माझाकडे जी अजून कोणाकडेच नव्हती. मग मी श्रीमंतच ना ..... होस्टेलचे रेक्टर/ मेस म्यनेजर/ स्वीपर/ शिपाई अशी सर्व कामे करणारे श्री लान्घी. नेहमीच उपकृत असत माझ्यावर. एकूण काय त्याही परिस्थितीत स्थावर होण्यामागे या सर्व लोकांचे खूप सहकार्य लाभले. कारण मी स्थावर होईस्तोवर बरेच विदयार्थी पळून गेले होते.
F.Y.B.Sc. पास झालो. कमवा व शिका चे कामं चालूच होते. संध्याकाळी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणे हा आमचा आवडता छंद. अशा अनेक विसायांवर आम्ही वाद घातलेत. अर्थातच हे वैचारिक मतभेद असत. पण चुरस मोठी असे. त्यासाठी लागणारे मुद्दे, पुरवणी मुद्दे हे अगदी इन्स्टट असत. कारण वादाचे विषय ठरलेले नसत. ते अचानक प्रकट होत. त्यामुळे वाद घालणे आणि वाद विवाद ऐकणे यात एक वेगळीच मजा असे. संपूर्ण वसतिगृहाचे दोन भाग पडत. एक ग्रुप च्या बाजूने आणि दुसरा विरुद्ध बाजुने. असो त्यामुळे खूप ज्ञान वृद्धीही झाली हे वेगळे सांगायला नको. आपले मुद्दे पटवून देण्याचे वेगळे कला या माध्यमातून मिळाली. वादविवादात अग्रभागी असलेले सतीश चोपडे, विलास भालेराव, गणेश बारगजे, मोहन कडाळी, बाबा थोरात आणि मध्येच कॉमेडी करणारे संतोष काळे, एन. जी. नेहमी सिरिअस मूड मध्ये असणारा मनोज वदक यांना विसरणे शक्यच नाही. वसतिगृहामध्ये टीव्ही नसणे किती हितकारक असू शकते याच वस्तुपाठच मला येथे मिळाला. करमणुकीचे काहीच साधन नसल्याने असे उद्योग आम्ही करत असू. एखाद्या संध्याकाळी संगीतरजनीही जमे. समान ठेवण्याच्या पेट्यांचे ट्रिपल बनत कुलुपाच्या किल्ल्यांची घुंगरू आणि सुरु होई गायनाची मेजवानी. आवाज कसा का असेना मनापासून गाणे म्हटल्यास ए सामोरच्या हृदयापर्यंत पोहोचते, हे हि येथेच शिकलो. बाबा थोरात चे ‘चलते - चलते मेरे ये गीत याद रखना’ आजही जसेच्या तसे लक्षात आहे. गणेश बारगजे ‘कही दूर जाब दिन ढल जाये’...... काय म्हणायचा म्हणून सांगू. डोळ्यातून पाणीच यायचे. त्यांची आणि आमच्याही! .. आणि विलास भालेराव चे ते ‘ओ हरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौनसे जल में कोई जाने ना....... जसेच्या तसे लक्षात आहे. किशोर कुमारची ओळखच मुळी मला या मंडळीनी करून दिली आणि किशोर कुमार माझे लाईफ लॉंग फेवरेट गायक बनले.
कॉलेज सकाळी असल्याने दुपार रिकामी मिळायची. दोन तास काम करूनही वेळ मिळत होता. या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे असे नेहमी वाटे. तीव्र इच्छाशक्ती तुमच्या इच्छा पूर्ण करते... इच्छा असली कि मार्ग निघतो म्हणतात. याचा प्रत्यय मला कित्येकदा आलाय. एकदा तर मी प्रयोग करून पाहिलंय. शिर्डी दर्शनाला जायचे ठरवले. निघालो घरून. खिशात बिलकुल पैसे नाही. मोटारसायकल वाल्यांकडून लिफ्ट घेत घेत पोहोचलो शिर्डी ला आणि तसाच परतलोही. कुठेही पैसे लागले नाहीत. शिर्डी ला भोजनालयात कुणीतरी पंगत दिली असल्याने तेथेही जेवणासाठी पैसे लागले नाहीत.
हा तर माझा मित्र संदीप आरोटे एका कॉम्पुटर क्लास मध्ये शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी जात असे. श्री. पराड सरांचे ते क्लास. एके दिवशी संध्याकाळी संदिप्बार्बर गप्पा मारताना मलाही काहीतरी नवीन शिकायचे आहे असा विषय निघाला. संदीप काम करत होताच. तुझ्यासारखे मलाही काहीतरी काम शोधून काढ असे संदीप ला सुचवले. मित्राने एखादे काम सांगितले आणि संदीप शांत बसेल असे शक्य नसे. दुसर्याच दिवशी त्याने काम शोधून काढले. काम करण्याची इच्छा आणि धमक हवी कामाला तोटा नाही. पण ज्याला काम करायचे नसते त्याच्याकडेही कारणांची कमी नसते, संदीपची हि वाक्य मी आयुष्यभरासाठी लक्षात ठेवलीत अगदी जशीच्या तशी. संदीप ने माझ्यासाठी शोधलेले काम एका फोटो स्टुडीओ मधील होते. कलामंदिर फोटो स्टुडीओ. प्रो.प्रा. आन्ना सावंत. स्टुडीओ मध्ये साफसफाई करणे, पाणी भरून ठेवणे, कॅमेरा ची स्वचाता ठेवणे बिलाप्रमाणे फोटो काढून देणे. हिशोब ठेवणे अशी कामे सुरुवातीला करत असे. नंतर आन्ना  मधील शेठ कधी गळून गेला व तो कधी मित्र बनला हे आम्हाला दोघांनाही समजले नाही, शेठ आणि नोकर असे नाते कधीच संपले होते. त्याने मला फोटो काढायला शिकवले. सर्व कॅमेर्यांची माहिती करून दिली. फोटो डेव्हेल्पिंग करणे शिकवले. आणि विदेओ शूटिंग सुद्धा. एक वर्षात मी अगदी सराईत फोटोग्राफर बनलो तेही अन्ना सावंत च्या मार्गदर्शनाखाली. कारण अन्ना सावंत हा राजूर अकोले संगमनेर भागातील खूप नावाजलेला फोटोग्राफर होता. चेहऱ्यांचे अंगल लाईट रेफ्लेक्टीओन चे अप्रतिम ज्ञान आन्नाकडे होते. ते सर्व ज्ञान माझ्या विनयशील स्वभावामुळे आण्णाने मला दिले. अगदी कुठलाही हाताचा राखून न ठेवता. खरच आण ग्रेटच आहे. वरतून त्याची गाडी बजाज एम ८० आणि नंतर सी टी १०० वापरायला मिळायची ते वेगळेच.
एस वाय बी एस्सी ला असताना सुहास आनदगावकर राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेसाठी जाण्याच योग आला. आमच्या कॉलेजमधील शेलद या गावाचा एकनाथ यादव नावाचा एक नावाजलेला वादविवाद पटू बरोबर तिकडे जाणे झाले. हे महाशय खूप पोहोचलेले होते. खूप सार्या सामाजिक कामांमध्ये यांचा हिरीरीने सहभाग असे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर यांचे सलोख्याचे संबंध होते. एकदा तर यांनी कोलेज मध्ये स्ट्राईक घडवून आणली होती. किती रडले होते आमचे प्राचार्य टी एन कानवडे सर. विषय कितीही साधा असला तरी त्याला वेगळे रूप देण्याची व तो रंगवण्याची हातोटी या महाशयांकडे होती.  त्यांच्याबरोबर मी या वादविवाद स्पर्धेसाठी गेलो आणि अजून एक बिंदू जोडला. आजपर्यंत बरोबर आणि चूक अशा दोनच गोष्टी असतात असे माझे प्रामाणिक मत होते. आणि त्याप्रमाणे मी वागतही होतो. बरोबर म्हणजे ज्याला समाज चांगले म्हणतो असे आणि चूक म्हणजे समाज ज्याला वाईट म्हणतो असे, पण या वादविवाद स्पर्धेपासून चांगले वाईट किंवा चूक बरोबर असे काही नसतेच ते तुमच्या ग्रहण शक्तीवर अवलंबून असते याच मला प्रत्यय येथे आला. आपला चुकीचा विषय कसा रेटता येतो याची झलक मला येथे पहावयास मिळाली. आणि मला भेटला नवीन बिंदू. .....



पिंपळाच्या झाडाजवळ.
                             ....... डॉ. अविनाश लांडगे (सांगाती)
पिंपळाचे झाड लिहिता लिहिता दोन प्रकरणे लिहून झाली. खरे तर ती कधी आणि कशी झाली ते कळलेच नाही. आयुष्याच्या प्रवासातही असे प्रसंग काय कमी वेळा येतात!  ठरवून ठेवलेली कामे करता करता अनपेक्षित धक्का देणारी सुखद घटना / कामे घडून जातात. बोनसच असतो तो म्हणा!  याचे सुख जास्त मिळते माणसाला. म्हणजे बघा न तुम्हालासुद्धा हा अनुभव आला असेल. लहानपणी कपड्याच्या दुकानात गेल्यावर दोन शिरत आवडले, त्यातला एक चोईचे करायची वेळ आली, हवे तर दोन्ही आहेत आणि दुकानदार म्हणतो कि एकावर एक फ्री आहे. कित्ती मज्जा. काय आनंद होतो ना. त्यावेळचा कोणाच्याही चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. असेच झालेय माझ्याही बाबतीत एर्हवी एखादे पण लिहायचे जीवावर येणारा मी आज चक्क दोन प्रकाराने संपवली, म्हनण्यापेक्षा कधी लिहून झाली कळलीच नाही. हा सुद्धा एक प्रवास आहे म्हणा. या प्रवासाची मजा तुम्हालाही येईल माझ्याबरोबर. कारण एव्हाना तुमाच्या लक्षात आलेच असेल कि हा प्रवास थोड्याफार फरकाने तुमचा पण आहे.
औरंगाबादचा वाद विवाद स्पर्धेनिमित्ताने सापडलेला बिंदू माझ्या आयुष्याला वळन देऊन गेला असे मी म्हटलो. पण याचा आणि पिंपळाच्या झाडच काय संबंध असे तुम्ही म्हणाल. खर तर औरंगाबाद मध्ये मला माझ्या एका वेगळ्या पैलूची ओळ्ख झाली. आजपर्यंत माझ्याकडे लोक निरागस आहे म्हणून आकर्षिले जातात असे समजत होतो. पण तसे नसून आपल्यात अजून एक गुण आहे हे माझ्या लक्षात आले ते औरंगाबाद ला. तो गुण म्हणजे लाकांना आपण जे काय सांगतो जो विषय पटवण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये लोकांना गुंतवून ठेवतो. मी जे काही बोललो ते लोकांनी लक्ष देऊन ऐकले.. त्यातून काहीतरी अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. आजपावेतो हि गोस्ज तुमच्याही लक्षात आली असणार कि आपण काही लोकांचे विचार भाषणे फार लक्षपूर्वक वाचतो, ऐकतो. तर कधी कधी समोरचा माणूस फार महत्वाच काहीतरी फार महत्वाच आहे असे माहित असूनही आपले त्या माणसाच्या बोलण्याकडे लक्ष नसते. काही वेळा रटाळ विषय वक्त्याच्या विशिष्ट गुणांमुळे विघायावर खिळवून ठेवतात, त्याच्या विरुद्धही घडतेच.
तर मी बोलता असताना लोक माझ्या बोलण्यावर किळून राहतात हे आतापर्यंत माझ्या लक्षातच आले नव्हते. मला उगाचच माझ्या निरागसपणावर अभिमान वाटे. जसजसा मोठा झालो तसतसा जगाचा खरा चेहरा दिसायला लागला. तुम्ही निरागस आहात म्हटल्यावर तुम्हाला फसवनार्यांची गर्दी तुमच्या भोवती जमा होते. या सर्वांना आधार मिळाला तो कथाकथन स्पर्धेने. या कथा कथन स्पर्धेमध्ये मी पिंपळाच्या झाडाची गोष सांगितली होती. खरे तर हे पिंपळाचे झ्झाद मला सापडले होते फोटोग्राफी करत असताना. त्याचे झाले असे-
राजूर मध्ये कानकाटे मंडळी तशी मालदार पार्टी. त्यांच्यापैकीच कोणाच्यातरी मुलाच्या लग्नाच्या शुटींग च्या निमित्ताने मी आणि विकास देशमुख वैजापुरला गेलो होतो. फोटोग्राफर बद्दल प्रचंड ग्ल्यामर असते हे एव्हाना माझ्या लक्षात आले होते. याची दोन तीन कारणे आहेत. एक तर क्यामेर्याबद्दल उत्सुकता असते. आपण फोटोग्राफरशी जवळीक केली तर तो आपला फोटो चांगला काढील किंवा तो गर्दीमध्ये आपल्यावर झूम करेल किंवा फोकस करेल अशी भाबडी अपेक्षा. आणि मुळातच फोटोग्राफर हा फ्रेश मूड मध्ये असणे गरजेचे असते. त्याला त्याची कामे दुखी कष्टी चेहऱ्याने किंवा वैतागलेल्या चेहऱ्याने करून चालणार नाही.कारण त्याच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभाव त्याच्या कामावर पडतो. त्याच्या चेहऱ्यावरच्या भावभावनानुसार समोरची व्यक्ती भावमुद्र देत असते. म्हणून त्याला त्याचा मूड नेहमी ताजातवाना सदाहरित ठेवावा लागतो. ठेवावा लागतो म्हणण्यापेक्षा तो राहतो याचेही एक कारण आहे. समोर एवढी ‘हिरवळ’ फिरा असताना याची काय बिशाद मोड खराब होउ देण्याची. नेहमीप्रमाणे मी आणि विकास आळीपाळीने कधी शूटिंग तर कधी फोतोग्रफी  करत होतो. विकास ‘हिरवळ’ पाहण्यात दंग होता. लग्नात हरखून जाण्यासारख्या गोष्टी असतातच की ! आपल्या सगळ्यांना अनुभव आहेच. हा अनुभव घेण्यासाठी लग्न करण्याची गरज नसते. फक्त कोणाच्यातरी जवळच्या व्यक्तीच्या लग्नाला जावे लागते. बरोबर ना! त्यातल्या त्यात करवला म्हणून गेला तर काय विचारायलाच नको.
या लग्नाच्या वेळी मी काहीसा माझ्याच कोशात होतो. चार दिवसांनी कॉलेज मध्य कथाकथन होते. मला औरंगाबादला सापडलेल्या माझ्या गुणाची ‘खरच मी लोकांना माझ्या बोलण्याच्याभोवती खिळवून ठेवू शकतो का?’ या (बिंदूची) प्रचीती  confirmary test घ्यायची होती. कॉलेज मधील कथाकथन स्पर्धेसाठी मी माझी उमेदवारी दिली होती. कॉलेज मध्ये आर्ट्स व्हर्सेस सायन्स अशी चुरस चालत असे. त्यावेळी कॉमर्स शाखा सुरु झालेली नव्हती. कथाकथनाच्या स्पर्धेदरम्यान वेगवेगळ्या न ऐकलेल्या कथा ऐकावयास मिळत म्हणून प्रचंड गर्दी असे. साधारणता गोष्ट ऐकायला लहानापासून सानांपर्यंत सर्वांनाच आवडते ना, म्हणून बाकी इतर कोणत्या स्पर्धेला असो व नसो या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभत असे. हॉल खचाखच भरलेला असे. या निमित्ताने आपली ओळख कॉलेजभर करण्याची हि एक नामी संधी असे. पण जर का कथा आपटली तर काही सांगायला नको, तुम्ह समजू शकता. .... समोरच्याने न मारताही मार कसा खाल्ला जातो याचा अनुभव प्रत्यकाच्या आयुष्यात असतोच तो आपण एक्सप्लेन नाही करू शकत.
मी लग्नाची शूटिंग करत असताना कोणती कथा सांगायची यावर विचार करत होतो. सकाळपासून एक चोठासा मुलगा साधारण २-३ वर्षाचा असेल सारखा माझ्या मागे मागे दादा-दादा करत फिरत होता. मी मध्याच त्याच्यापासून सुटका करून घेत तर कधी त्याचे मनोरंजन करत माझे काम करत होतो. तो मुलगा कोणाचा आहे/ होता हे काही मला शेवटपर्यंत कळले नाही. तो दिवसभर माझ्या मागे मागे फिरत राहिला. अगदी जेवतानाही माझ्या ताटात जेवला. त्याची दादा-दादा, दादा-दादा ची हाक सारखी माझ्या कानावर येत राहिली. बिदाई ची वेळ आली तरी तो मुलगा माझ्या मागे मागे फिरत होता. तो बाकी काहीच बोलत नव्हता. फक्त एकाच रट दादा-दादा, दादा-दादा.
बिदाई सुरु झाली. मुलगी रडू लागली, मिलीची आई, वडील, भाऊ, बहिण सर्वच रडू लागले. हा इमोशनल सीन माझ्या आयुष्यात खूप वेळा आलाय कारण बर्याच लग्नांची बिदाई मी माझ्या कॅमेर्यामध्ये कैद केलीय. हे सर्व करत असताना मी प्रत्येक बिदाईच्या वेळी मुसमुसून रडलोय. एकदा तर एका अनोळखी लग्नात माझ्या बिदाई चा सीन रेकार्ड करत असताना माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून नवर्या मुलीने हसून दिले होते. तिला हसताना पाहून माझ्याकडे बघून सर्व वर्हाडी मंडळी आणि मुला मुली कडील मंडळी हसत होती. याही बिदाई च्या वेळी माझी डोळ्यात अश्रू होते. आणि तो छोटा मुलगा जो सकाळपासून माझ्या मागे मागे फिरत होता तोही माझ्याकडे बघून रडत होता. ते ओअहून मला आणखीच रडू आले. कारण खर्या अर्थाने आमच्या बिदाईची वेळ झाली होती. तो परत कधी भेटेल कि नाही हेसुद्धा माहित नव्हते. शेवटपर्यंत तो मुलगा कोणाचा त्याचे आई वडील कोण हे मला काही समजू शकले नाही. आणि तो गायब झाला. बहुदा बिदाई नंतर ब्याग भरण्याच्या गडबडीत त्याचे आईवडील त्याला घेऊन गेले असावेत.
मला कथा सापडली होती. कधीतरी इंग्रज राजवटीत अस्पृश्य लोकांवर होणार्या अत्याचारांबद्दल मी वाचले ऐकले होते. असाच एक अस्पृश्य बाप आणि त्याचा मतीमंद मुलगा ज्याला फक्त बाबा बाबा म्हणता येते, यांच्याभोवती हि कथा गुंफायची असे मी मनोमन ठरवले आणि पुढील लग्नाच्या शूटिंग साठी भटक्या जमातीच्या जगण्याच अनुभव घेत आलेफाटा बारा बंगला येथे निघालो. नवीन बिंदूच्या शोधात.........



पिंपळाचे झाड....... डॉं. आविनाश लांडगे (सांगाती)  
coming soon coming soon ...................





जगाच्या रंगमंचावर.... डॉं. अविनाश लांडगे (सांगाती)    
काही प्रश्न माझ्या मनात काहूर घालताहेत. बघतो जमताहेत का कागदावर उतरवायला. तसे बरेचशे असे प्रश्न तुम्हालाही पडलेले आहेत. फक्त माझ्या माध्यमातून ते कागदावर येताहेत एवढाच काय तो फरक. सर्वप्रथम आणि स्वाभाविक प्रश्न प्रत्येकाच्या जीवनात असतो. आणि तो जीवनाबद्दलच असतो. किती गम्मत! जीवनामध्येच जीवनाबद्दल प्रश्न? किती अफलातून आहे सगळं....... प्रश्न येतातच मुळी जेव्हा अडचणी येतात, पराभव होतात, विजय होतात, मग त्यामागची कारणमीमांसा लिहिली जाते..... अध्यात्मिक भाषेत सांगायचे तर चिंतन केले जाते, राजकीय भाषेत विजयाचा जल्लोष केला जातो. मनातल्या मनात प्रश्नांची मालिका सुरु होते......... मनच मनाला समर्पक उत्तरे देऊ लागते....... अमुक एक कृती चूक कि बरोबर या तराजूत तोलली जाते. ..... त्या त्या कृतीला चूक किंवा बरोबर ठरवण्यासाठी पुष्ठी, पुरवणी घटना, कृतीचे दाखले दिले जातात. आणि प्रकरणावर पडदा पडतो. अर्थात हा सर्व खटाटोप समोरचा चूक कसा आणि मी बरोबर कसा या विषयावरच चालू असतो. आलेले निष्कर्ष किती बरोबर, आहेत याची पडताळणी बहुदा होत नाही. कारण कोणतीच गोष्ट बरोबर किंवा चूक नसते. हे फक्त मनाचे मनाला समजावणे चालू असते.
समाजामध्ये घडणाऱ्या कित्येक घटना आपण पाहतो. खरेच या घटनांचे खरे रूप आपल्यासमोर येत असेल का? बहुदा त्या ‘सु’रुपात आपल्या समोर येत असाव्यात. कारण या घटनेमधून समाजाला काय संदेश जाईल यावर जास्त भर दिला जात असावा व त्या पद्धतीने त्या विशिष्ट घटनेची मोडतोड करून त्या सर्व घटनेमध्ये हे चूक हे बरोबर चे मुलामे देवून टी घटना सदर केली जात असावी असा माझा प्राथमिक अंदाज आहे.
देशाच्या दक्षिण प्रांतात म्हणे रावणाला पूजतात....... का बरं असेल असे?..... बराच विचार केला या प्रश्नावर आणि फक्त एकाच निष्कर्षावर पोहोचलो....... जो जिता वही सिकंदर..... झुकती ही दुनिया झुकानेवाला चाहिए...... जो जिंकतो त्याचा इतिहास लिहिला जातो.त्यासाठी घटना किंवा कृती कशी बरोबर किंवा चूक याकडे लक्ष वेधण्यासाठी दाखले देणे आले. आणि कुणी तरी एक हिरो आणि एक विलन म्हणून प्रस्तावित होईल. अशा प्रकारे त्याचे अनुयायी बनतील. बरोबर ना!......... याचाच दुसरा अर्थ असाही होतो जर का राम आणि रावण यांच्या भांडणात रावण जिंकला असता तर कदाचित एखाद्या रावण भक्ताने ‘रावणायन’ लिहिले असते. आणि राम कसा चुकीचा होता, याने सीतेला वनवासात न्यायला नको होते, लक्ष्मणाने शुर्पनखेची छेड काढायला नको होती (रावणाच्या बाजूनेचा अर्थ) किंवा लक्ष्मण शुर्पनखेला  समजावूनही शकत होता, सीताच कसी दुर्दैवी होती, सितेमुळेच रामाच्या वाटयाल वनवास कसा आला, रामाचे हे दुर्दैव घालाविण्यासाठीच रावणाने सीतेचे अपहरण कसे केले....... वगैरे ... वगैरे...... झाले असते का असे? तुम्हाला काय वाटते?...
माझ्या लेखनामध्ये व्यत्यय आला .... थांबतो थोड्या काळासाठी ... पुन्हा कधीतरी लिहील या विषयावर.. पुढचे बंडखोर विचार लिहायला मन धजेना..... काय होतंय माहित नाही हे सर्व लिहायला मन अजून तयार नाही. जेव्हा मी पूर्णपणे तयार होईल तेव्हा माझ्या तुमच्या मनातला कोलाहल सप्रमाण कागदावर येईलच ... बोलूयात पुन्हा कधीतरी या विषयावर ........ तोपर्यंत बिंदू शोधत रहा....

(११.१२.२०१५)



एन जी . ..... डॉं अविनाश लांडगे (सांगाती)
आयुष्य कोणाचेही असो, कॉलेज चे दिवस प्रत्यकाच्या आयुष्यात यायलाच हवे. असे माझे प्रामाणिक मत आहे. म्हणजे शाळा कॉलेज चा हाच तो एक काळ असतो जेथे सर्व लेबल्स गळून पडलेले असतात. गरीब, श्रीमंत, हुशार, मठ्ठ, आणि बरेच काही. स्वच्छंदी जगण्याचा, खरे जीवन जगण्याचा तोच एक काळ असतो. वार्यावर स्वर झालेले तारुण्य, स्वैर विचार करण्याचे व त्यानुसार अनुकरण करण्याचे हेच ते काय दिवस असतात. नंतरचा काळ माणसाला एका बंदिस्त चौकटीत बंद करतो. बर्याच वेळा हि चौकात तोडण्याचा प्रयत्न होतो, केला जातो. पण कालानुरूप ती अधिकाधिक घट्ट होत जाते. चुन्याच्या बांधकामासारखे, जेवढे जुने होईल तेवढे ते पक्के होत जाते.
राजूर कॉलेज चे दिवस खरेच मंतरलेले दिवस होते. कॉलेज मध्ये माझ्या आत्मविश्वासात भर पडायला आणखी एक व्यक्ती होती, .... एन. जी....... एन जी आणि मी भेटलो तो क्षण स्पष्टपणे आठवत नाही. पण जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही वेगळे नाहीच आम्ही एकरूप आहोत याची खात्री मनोमन पटली. आमचे सारखे आडनाव कारणीभूत असेल कदाचीत या गोष्टीला. कुनितरी माझ्याच आडनावाचा मुलगा होस्टेल मध्ये राहतो एवढे मला कळले होते. आम्ही एका खोलीत (१२ बाय १५ ची खोली) १२ लोक राहत असू. जगामध्ये भावनिक सहचर्याचा दुसरा आदर्श शोधून सापडणार नाही. आम्ही पाच खोल्यांच्या त्या वसतिगृहामध्ये ६० लो राहत होतो. खरे तर त्या खोल्या महाविद्यालयातील शिपायांसाठी महाविद्यालय परिसरात राहन्यासाठी  बांधलेल्या होत्या. त्याच पाच खोल्यांचे रुपांतर वसतिगृहात करून तेथे ५०-६० मुलांची सोय केली होती कानवडे सरांनी. आम्ही सर्व जाती धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहत असे. होस्टेल मध्ये शक्यतो भांडण कधीच झाले नाही. म्हणूनच आदर्श सहचर्य असे नाव मी म्हणालो. वसतिगृहातील प्रत्येक मुलगा गरजू होता, विशेष म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी.धडपडणारा होता. त्यापैकी मीही एक होतो यात वाद नाही. कोणी कितीही म्हनुद्यात पण परिस्थिती माणसाला विनयशील बनवते असा माझा प्रामाणिक अनुभव आहे. हाच विनाय्शिल्पना माणसाला आयुष्यभर पुरतो सुद्धा. म्हणून आम्ही पुढील आयुष्यात कधीच खचलो नाही. प्रत्येक उपरात परिस्थिती आपल्यामध्ये पैलू पडण्यासाठीच निसर्गाने तयार केलेली असते अशी माझी ठाम श्रद्धा आहे. या सर्व बरोबर माणसाने कधीच जुने दिवस विसरता कामा नये, कि शिकवणही आम्हा सर्वांना याच सहचर्यातून मिळाली......
एन जी होस्टेल मध्ये भेटला आणि आमचा ऋणानुबंध कायमचा बांधला गेला. आत्मविश्वास जागविण्यासाठी एन जी एक महत्वाचा दुवा ठरला असे मीन म्हणालो. याचे कारण एन जी अंगापिंडाने माझ्यापेक्षा उंच होता. त्याची जन्म तारीख माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान होती तरी तो मोठा दिसे. साहजिकच होस्टेलमध्ये मुले आम्हाला मोठा आणि छोटा लांडगे म्हणत असत. न.जी मोठा दिसत असला तरी प्रत्येक गोष्ट मला विचारून करत असे. नंतरच्या काळात मोठा लांडगे चे नामकरण त्याच्या इनिशियल्स वरून एन. जी. असे झाले. अडचणीच्या काळात मीही नेहमी त्याच्या मागे सावली सारखा उभा राहिलो. अगदी त्याचे लग्न होईपर्यंत. त्यानेही तेवढ्याच श्रद्धेने माझ्या गोष्टी ऐकल्या. माझे कुणी तरी ऐकतय, मी सांगितलेल्या गोष्टी कुणीतरी फोलो करतयं यात एक वेगळेच समाधान aअसते. ते समाधान एन. जी. ने मला दिले आणि त्यामुये माझा आत्मविश्वास वाढन्यासाठी  नाक्किच मदत झाली.
उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत तो नेहमी माझ्या घरी असे. आम्ही अशा सुट्ट्या एकत्र घालवलेल्या आहेत. शेतात एकत्र काम केले. रोजन्दारीनेही कामाला गेलो सुटी संपत आली कि मिळाले पैसे घेऊन आम्ही एन जी च्या गावी जात असू. तेथे दोन तीन दिवस राहून पुन्हा कॉलेज ला परतत असे. कॉलेज ची फीस, वह्या पुस्तके, प्रवस खर्च यासाठी हे पैसे पुरत. कमी पडलेले पैसे माझी आई एन जी ला देत असे.
एन जी माझ्या मनात घर करून राहिला तो वेगळ्या कारणाने. विश्वासाचे अप्रतिम उदाहरण होऊ शकेल हे. आम्ही एस.वाय ला असताना माझ्या मावस बहिणीच्या लग्नानिमित्त राजुर्हून साधरण ३५ कि,मी. धांदरफळ या गावी गेलो होतो. ते ठिकाण माझ्या गावापासून १० कि मी अंतरावर आहे. त्या दिवशी प्रक्टीकल परिक्षेचा शेवटचा दिवस होता. परीक्षा संपायला थोडा वेळ लागला.लग्न दुसर्या दिवशी होते. तरी आम्ही साधारण पाच वाजेच्य सुमारास राजुराहून निघालो. भाडयासाठीचे पैसे होते त्यामुळे टी चिंता नव्हती, एर्हवी टी चिंता पहिली असे. लग्नाच्या ठिकाणी गाड्या बदलत जाने भाग असल्याने आम्हास थोडा उशीर झाला होता. साधारण ७ कि मी ची पाय्पितही करावी लागणार होती. लग्न ठिकाणी जाण्यासाठी आम्हास धांदरफळ गावाजवळील प्रवरा नदीमधून जावे लागणार होते. मजल दरमजल करत आम्ही धांदरफळ फाट्यावर पोहोचलो. तेथून तीन कि मी पायी गेल्यावर नदी होती. त्यानंतर मावशीचे घर. जेथे उतरलो तेथून विरुद्ध दिशेला पाच सात कि मी वर माझे घर. संध्याकाळ होऊन अंधार पडला होता. आता आपण पायी जरी गेलो तरी एखाद्या तासात पोहोचू असा विचार करून आम्ही नदीच्या दिशेने निघालो. कॉलेज सुटल्यावर आम्ही तडक निघालो असल्याने आमच्याकडे काही कोणती ब्याग वगैरे नव्हती. चालत जाऊन प्रवरेतीरी पोहोचलो आणि मी तर बसूनच घेतले. नदीमध्ये भंडारदरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडलेले जाते. नेमके त्याच वेळी आवर्तन सोडलेलं असल्याने नदीमध्ये पाणी होते. आता परत माझ्या घराकडे जायचे म्हणजे आठ ते दहा कि मी  पुन्हा पायपीट करावी लागणार. जर नदी पार केली तर २ कि मी वर मावशीचे घर. बरं परत घरी जरी गेलो तरी उद्याच्या लग्नासाठी  घरचे सर्वजन मावशीच्या घरी आले असणार आणि उद्या परत लग्नासाठी यायचे म्हणजे हीच पायपीट करत यावी लागणार.
मी एन जी ला विचारले, काय करूयात? लहानपणी मामाच्या घरी जाताना बर्याचदा मी हि नदी पार केलील होती पण त्यावेळी आई बरोबर असे. आई ला या नदीचे सर्व उतार माहित होते. पण आता परिस्थिती बदलली होती. सततच्या वाळू उपश्यामुळे कोठे खड्डा असेल याची शाश्वती नव्हती. काय करावे सुचेन. एन जी ने नेहमीप्रमाणे कोणताच निर्णय दिला नाही. तू जे म्हणशील ते करूयात असा निर्णय त्याने दिला. त्या अंधारात मला नदीच्या पाण्याचा अंदाजही बांधता येईना. लाईट गेलेली होती. बहिणीच्या लग्नाला जाण्याची अनावर इच्छा, शिवाय सर्व नातेवाईक तेथे भेटणार, मग काय भावनिक निर्णय झाला. अशा वेळी भावना बुद्धीवर सरस ठरतात. निर्णय झाला नदी पार करायची.
आदर्श पुरुषांच्या कथा ऐकताना, सानेगुरुजी, वीर सावरकर जसे पोहून नदी पार करत, पोहताना कपडे डोक्याला बांधत त्याप्रमाणे हे धाडस करण्याचे आम्ही ठरवले. ठरल्याप्रमाणे आम्ही दोघांनीही कपडे काढले व डोक्याला बांधले आणि आम्ही नदीत प्रवेश केला. एक तृतीयांश नदी पार करेपर्यंत पाणी छातीला लागले होते. एन जी ला पाण्याचा काहीच अंदाज नव्हता नव्हे तो वाहती नदी प्रथमच पार करत होता. आम्ही पुढे पुढे सरकत होतो. आता नदीपात्रातील वाळू आमच्या पायाखालून सरकतेय याची आम्हाला जाणीव झाली. मी पुढे आणि एन जी मागे असे आम्ही एकमेकांचे हात धरून चाललो होतो. वाळू सरकाल्याची व प्रवाहाचा वेळ वाढल्याची जाणीव मला झाली एव्हाना पाणी आमच्या हनुवटीपर्यंत लागले होते. आता पाणी आम्हाला ओढू लागले होते आम्ही नदीच्या बरोबर मध्यभागी उभे होतो. नदीला पाणी सोडल्यावर दिवसभर विजेचे लोडशेडिंग असे. त्यामुळे नदीकाठी एकही विजेचा दिवा लागलेला नव्हता. नदीच्या किनार्यावर माणसांचा मागमूसही नव्हता. आता आम्ही नदीमध्ये वाहून जाणार याची पुरेपूर खात्री मला पटली. पाणी माझ्या कानाला व नाकाला लागले होते. एन जी थोडा उंच असल्याने पाणी त्याच्या हनुवटी पर्यंत लागले होते. आम्ही मागेही फिरू शकत नव्हतो.कारण मागे फिरताना थोडा जरी मार्ग चुकला तरी शंभर टक्के आपण वाहून जाणार याची खात्री होती. अवि, वाळू जोरात सरकायला लागलीय नदीपात्रात उतरल्यापासून एन जी पहिल्यांदाच बोलला. मीही त्याला हो खरय एवढेच बोललो. आतापर्यंत आपण वाहून जाणार याची मला पूर्ण काल्पना आली होती. मला पोहता येत होते, जरी वाहून गेलो तरी तरी आपण तरंगून राहिलो तर नक्की वाचू याची खात्री मला होती. याच नदीत मी पोहायला शिकलो होतो. आम्ही एका जागी स्तब्ध होतो. पाण्याच वेग वाढत होता. काय कराव सुचेना. आरडाओरडा करून पहिला पण आजूबाजूला कुणीच नव्हते. मी एन जी ला म्हणालो जरी आपण वाहून जायला लागलो तरी फक्त तरंगून राहायचे. प्रवाह पार करण्याचा प्रयत्न करू नको. त्यामुळे आपण थकू आणि बुडू त्यापेक्षा फक्त तरंगून राहण्यासाठी आपल्याला कमी शक्ती लागेल आणि आपण जिवंत राहू शकू.
मला कुठे पोहता येतेयएन जी म्हणाला. तशाही परिस्थितीत मला घाम फुटला. मी एन जी च्या निरागस चेहऱ्याकडे त्या अंधारातही पाहू लागलो. काय बोलावे मला कळातच नव्हते.
अरे मग तू नदीमध्ये उतरून नदी पार करायला कसा काय तयार  झालास? मी त्याला विचारले. 
तू मला कधीच बुडू देणार नाहीस याची मला खात्री आहे. तू म्हनास नदी पार करूयात, मी तुला कधी नाही म्हणूच शकत नाही” -एन जी.
आता सुन्न होण्याची वेळ माझी होती. केवढी मोठी हि जबाबदारी. येथे काही बरे वाईट झाले तर. तशाही परिस्थितीत माझे हातपाय गळाले.
श्रद्धा यापेक्षा काय वेगळी असेल हो. संपूर्णपणे त्या परमात्म्यावर आपला भर टाकून तो जसे घडवेल तसे घडायचे......... कोणतीही तक्रार न करता....... तो परमात्मा काहीतरी करतोय तो योग्यच करत असणार, ....... असेच असेल का काही?  एन जी ने माझ्यावर श्रद्धा ठेवली होती. मी त्याला कधीच बुडू देणार नाही.या श्रद्धेने मला अधिक जबाबदार बनवले. असेच होत असेल बहुदा देवाचे सुद्धा. जर भक्ताने १००% विश्वास आणि श्रद्धा ठेवली तर काय बिशाद आहे देवाची त्याची इच्छा पूर्ण न करण्याची. त्याला टी पूर्ण करावीच लागेल!.
मी लगेच स्वतःला सावरले. एन जी ला धीर दिला घाबरू नकोस काहीही होणार नाही. थोडा वेळ आहे त्या परीस्थितीत उभा रहा माझा खांदा सोडू नकोस. आणि मीही त्याचा हात घट्ट धरून ठेवला. साधारण पाच ते दहा मिनिटे आम्ही तसेच उभे होतो. मी मनातल्या मनात देवाचा धावा करत होतो. मी घाबरलोय हे एन जी ला कळू न देण्याची पुरेपूर खबरदारी मी घेतली.
साधारण दहा मिनिटांनंतर नदी किनार्यांच्या घरांमध्ये लाईट लागले. याचा अर्थ लाईट आली होती. लोडशेडिंग मुळे नादिकीनार्यावरचे सर्व वीजपंप बंद होते. ते चालू करण्यासाठी लोक नक्की नदीकिनारी येतील..... माझा अंदाज खरा ठरला. दुरून विजेर्या (Batery) चमकू लागल्या. आता आम्ही ओरडायला सुरुवात केली. काका, मामा, बाबा, तोंडात येतील ते शब्द आम्ही जोराने ओरडत होतो. आमचे शब्द किनार्यापर्यंत पोहोचले. आणि एक शेतकर्याने आमच्यावर विजेरी (ब्यटरी) रोखली. काय प्रकार आहे त्याच्या क्षणार्धात लक्षात आला. आम्हाला किनार्यावर यायचे आहे. आमची मदत करा. आम्ही ओरडत होतो.
थोडा वेळ आहे तसेच थांबा, किनार्यावरच्या वीजपंप आता चालू होतील आणि पाण्याची पातळी खाली जाईल मग मी जसजसा battery च्या प्रकाशाने रस्ता दाखवेल तसे तसे तुम्ही या त्याने धीर दिला.
माझ्या जीवात जीव आला आणि खरच पंधरा वीस मिनिटात पाण्याची पटली खाली गेली, आणि त्याने म्हटल्याप्रमाने त्याने दाखवलेलेल्या प्रकाशझोतात आम्ही नदी पार केली. बाहेर आल्यावर एकमेकांच्या गळ्यात पडून स्तब्ध उभे होतो. डोक्याचे कपडे सोडले. थोडावेळ तसेच उभे राहून अंग कोरडे होऊ दिले. कपडे घालून शेतकऱ्याचे आभार मानून लग्नाच्या दिशेने निघालो. या बिंदू ने मला खर्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा अर्थ समजावला........  
(१२.१२.२०१५)



मोकळ आकाश ...... डॉं. अविनाश लांडगे (सांगाती)

कुणा कुणाला बंधनमुक्त राहायला आवडेल असा प्रश्न जर विचारला तर माझ्या मते कुणीही ‘मला आवडणार नाही’ असे उत्तर देणार नाही. बरोबर आहे ना! त्याही पुढे जाऊन मी स्वतंत्रच आहे असे उत्तर देणारेही कमी भेटणार नाही.
काल नवीन वर्षाची सुरुवात झाली. खूप सारे शुभेच्छा संदेश आले व्हाटस ऍप वर. काही शुभेच्छा संदेश नवीन संकल्प करा या आशयाचे होते. यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणार संदेश होता देवळाली केंद्रीय विद्यालयामध्ये काम करणाऱ्या श्री. धनंजय पारकर सरांचा. पारकर सरांचा आणि माझा परिचय काही फार जुना नाही. पण जिव्हाळा मात्र तयार झाला तोही एकाच वर्षात. त्यांच्या विद्यालयात मी सिनिअर सुप्रीटेंडंट म्हणून सी.बी.एस.सी. बोर्डची परीक्षा घ्यायला गेलो होतो. म्हणून झाला हा परिचय. एकाच वर्ष झाले भेटीला, पण ती  खोलवर रुजली. ती भविष्यात अशीच बहरेल अशी आशा आहे. त्याचे कारण एकच आम्हाला दोघानाही दोघांकडूनही काहीच अपेक्षा नाहीत. तर त्या शुभेच्छा संदेशामध्ये नवीन वर्षामध्ये काय संकल्प करावा यावर ओशोंनी केलेलं भाष्य पारकर सरांनी मला पाठवले होते. अशोंच्या मते काहीच संकल्प करू नका काहीतरी संकल्प करायचा याचा अर्थ पारतंत्र्यात जायचे. कारण आपण आपल्या मनाभोवती या पद्धतीने काहीतरी कुंपणे टाकतो... आणि मग सुरु होतो त्या कुंपणा मध्ये घुसमटनारा प्रवास..... बर्याच गोष्टी कराव्याशा वाटतात. पण संकल्प केलाय ना! मग मन मारून जगणे आले. आणि एक दिवस येतो आणि तो संकल्प तुटतो. मग मनाची अगतिकता समोर येते. एवढे दिवस संकल्प टिकवून तरी काय फायदा झाला. त्यापेक्षा संकल्पच करू नका ना!  कशाला गोठवायचे  मन....... वा! संकल्पच न करण्याचा संकल्प केलाय मी या वर्षी. कमी अधिक फरकाने तुम्हा सर्वांच्या बाबतीतही हेच घास्डत असते का? बघा.... मला वाटते घडत असणार. असो..... हे झाले संकल्पाच्या बाबतीत. संकल्प म्हणजे नियम केला आपण आपल्या स्वतःसाठी..... बरोबर? म्हणजे या नियमाच्या बाहेर वागायचे नाही. पण एक्सेप्शनल केसेस मध्ये नियम मोडला तर चालतो. म्हणजे आपण स्वतःला स्वतःच्याच हाताने बांधून टाकतो. आहात न सहमत माझ्याशी...... मग आपण स्वतंत्र कसे? आज प्रत्येक माणसाने कोणत्या न कोण्या प्रकारे स्वतःला बांधून घेतलेय... हो! खर बोलतोय मी..... म्हणजे मी अमुक पक्षाचा.... म्हणजेच पक्षाची संहिता मी पाळली पाहिजे (अडकले)....... मी अमुक एक धर्माचा.... म्हणजे धर्माची संहिता पाळली पाहिजे. भले ती लादलेली का असेना. (बरोबर ना!..... अडकले पुन्हा एकदा..) बहुतेकांच्या बाबतीत तर धर्म .... जात या गोष्टी ओघाने, अनुवंशिकतेने आलेल्या असतात.आणि आपण सगळे या गोतावळ्यात जळमटाप्रमाणे संपूर्ण आयुष्य गुरफटून टाकतो. त्या जाळ्यात एकदा का अडकले कि पुन्हा सुटका नाही...... आयुष्यभर आपण, स्वीकारलेल्या संहितेच्या संकल्पनांवर विचार सुद्धा करत नाही. याचीही कारणे आहेत.... धर्मशास्रावर संशय घेणे हे सुद्धा पापच आहे. असा अजून एक प्रचलित सिद्धात.मग काय आहे तेच नियम काटेकोरपणे पाळायचे. त्या नियमांच्या बाहेर काही वर्तन झाल्यास ‘पाप’ केल्याचा अपराध मनात ठेऊन आयुष्य कुंठायचे..... असा संपूर्ण खेळ जीवनभर चालू राहतो.....
समाजात अशा अपराधी भावनेने जगणार्यांची संख्या काही कमी सापडणार नाही. म्हणून तर आत्मिक शुद्धीसाठी गंगातिरी आणि गोदातीरी इतक्या मोठ्या रांगा लागत असतील ना.... हे काही फक्त गंगा किंवा गोदावरीचे चित्र नाही. मस्जीदिमध्ये असो वा चर्च मध्ये प्रायःश्चीतापोटी मोठी रक्कम देणार्यांची संख्या काही कमी नाही.. बर एवढ करूनही आपण पापमुक्त झालोय का याची काहीच खात्री नाही..... म्हणूनच अशा साठत गेलेल्या पापांची मरते वेळी भीती वाटू लागते आणि माणसे मरताना रडू लागतात. खर तर जगण्याचे अंतिम सत्यच जर मरण हे आहे. मग ते जवळ आल्यावर आनंदोत्सव साजरा करण्याचे सोडून हे रडत का असतील? असा प्रश्न मला नेहमी पडतो.
म्हणजे बघा नां....... आपण एखाद्या प्रवासासाठी निघालो, अ पासून ब पर्यंत जायचंय, मग ब पर्यंत पोहोचल्यावर आपण आनंदोत्सव साजरा करायला हवा. किंवा आपण सुखरूप पोहोचलो, आपल्याला प्रवास अर्ध्यावर सोडवा नाही लागला याचे समाधान व्यक्त करायला हवे. बरोबर ना!.....अर्थातच आनंद  व्हायला हवा. मग अ म्हणजे जन्म, सुरुवात आणि ब म्हणजे मरण किंवा प्रवासाचा शेवट असे गृहीत धरले तर आपण हा प्रवास पूर्ण केल्याचा आनंद व्हायला हवा. बरोबर! ..... पण लोक रडत का असतील?... शोधूयात का?... मला या मागे काही कारणे दिसतात. बहुधा हा प्रवास खिलाडू वृत्तीने पूर्ण केला नसावा. त्यामुळे विजयाचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. हरण्यापेक्षा कुमार्गाने/ चुकीच्या पद्धतीने मिळवलेली विजयश्री जास्त टोचते. आणि हे सर्व कुठेतरी सद्सद्विवेकबुद्धीला पटत नाही. कारण तुम्ही बाह्य जगाशी, आपल्या माणसांशी, सभांमध्ये हे सर्व पटवून देऊ शकता किंवा त्या प्रकारचे भास तयार करू शकता कि तुम्ही  कसे बरोबर होतात किंवा आहात. पण तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीशी तुम्ही प्रतारणा नाही करू शकत....कुणीच नाही करू शकत. मग हेच शल्य आयुष्यभर वाढत जात असावे आणि मरण जवळ आल्यावर टोचत असावीत. स्वच्छ/ शुभ्र, निरभ्र, निर्भेळ विजयश्रीचा आनंद  ती सल आपल्याला आपल्याला मिळू देत नाही. आणि आपण दुःखी होतो/ कष्टी होतो / रडवेले होतो.
दुसरे एक कारण असण्याची शक्यता अशी आहे कि कदाचित लोकांच्या मोह, असूया, काही सुटत नाही.. जगामध्ये कायम, अविनाशी, pernmanent असे काहीच नाही हे माहित असून सुद्धा बर्याच गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. जे दुःखाचे कारण बनत असावे. म्हणजे बघा न, एक नवी कोरी गाडी (मोटारसायकल किंवा चारचाकी) घेतली कि साधारण वीस वर्षांनी ती कालातीत होणार आहे, असे माहित असूनही आपण ती गाडी कालातीत झाली म्हणून दुःख करणार असू तर त्याल काय म्हणावे?....
यामागचे तीसरे कारण नियम मोडले म्हणून असेल कदाचित. नियम म्हणजे धर्म, समाज, चालीरिती यांचे नियम. म्हणा. त्यामागची अपराधी भावना ..... मरणानंतर देवाला उत्तर द्यावे लागेल, याची भीती...... पण मग नियम तरी कुठे एकसारखे आहेत सर्वांचे? एका धर्मात एकद्शीच्या दिवशी मटन खाल्ले तर पाप, तर दुसर्या धर्मात त्याच दिवशी ईद नेहमी येते. एका पंथात मद्य पिणे म्हणजे अपराध, तर दुसर्या धर्मात तेच मद्य देवाला अर्पिले जाते. सामान्य माणूस मात्र या सर्व जन्जालामध्ये इतका गुरफटून जातो कि त्याच्या चेहऱ्यावरील तेज गायब होऊन अपराधांच्या गडद काळ्या डागांची संख्या मात्र वाढत जाते. आणि शेवटी रडकुंडीस येतात.
या सगळ्यापेक्षा मी निसर्गाने घडवलेली एक प्रतिकृती आहे. निसर्गाने ठरवून दिलेले नियम हेच माझे नियम आहेत असे गृहीत धरून जीवन व्यतीत केले तर! कशाला जल्मातांमध्ये अडकायचे आणि अडगळीत पडायचे. .... निसर्गाचा एकाच नियम आहे.. ओरबाडू नका बस्स. बाकी काहीच नाही.जे तुमच्या वाट्याला आहे त्यावर तुमचा हक्क आहेच आहे.... दुसर्याच्या वाट्याचे ओरबाडू नका. हा.... तो स्वेच्छेने देत असेल तर हरकत नाही. बरोबर ना...... म्हणजे पहा तुमची पूर्तता झाल्यावर दुसऱ्याला देण्यामध्ये तुम्हालाही आनंद होतोच ना. तसाच त्यालाही होईल. आनंद दोघांनाही होईल. आणि ज्या गोष्टीमुळे आनंद निर्माण होतो, तीच तर आहे पुण्याईची परिभाषा. ज्या गोष्टीमुळे दुःख निर्माण होते/ अर्थातच ओरबाडण्याच्याच्या वृत्तीने, हि आहे पापाची परिभाषा. पटतंय का तुम्हाला?.......
कोणत्याही खेळात जास्त नियम असले कि अपघात होतात. आणि कोणताही खेळाडू सर्व नियम लक्षात ठेवत, ठेवत खेळू लागला तर स्वच्छ्न्दीपणे खेळू शकत नाही.... आपण कमीत कमी नियम बनवले तर जीवन नक्कीच संगीतमय, आनंदमय होईल. आणि अपघाताची, चुकांची शक्यता राहणार नाही. सर्व नियम लक्षात ठेवण्याचीही गरज नाही.
मग आपल्या साध्यापर्यंत पोहोचल्यावर असणारा चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच द्विगुणीत करणारा असेल आणि आजूबाजूच्या लोकांनाही स्फूर्तीदायी ठरेल. कारण विरमरण हे नेहमीच स्फूर्तीदायी असते. त्याहीपेक्षा तुमच्या चेहऱ्यावरील समाधान लोकांना जगण्याची नवी उर्मी देईल आणि  तुम्ही बनाल एक ‘रोल मोडेल’ आदर्श व्यक्तिमत्त्व.

इति संपूर्णम....... निघतोय पुढच्या बिंदू च्या शोधात. (२.१.२०१६)



2 comments: