पिंपळाच्या झाडाकडे जाताना .....
लेखनाची एक वेगळीच मजा आहे. आपण जर का ठरवले आज लिहुयात तर नाहीच सुचत काही. खूप वेळा खूप घाईच्या वेळी, निवांत क्षणी काही बाही सुचून जाते जे खरच लिहावेसे वाटते .... नेहमीप्रमाणे आळस करत लिहू कधीतरी असे म्हणून तो विषय बाजूला पडतो आणि ... बाजूलाच पडतो. असे कित्येक विषय आतापर्यंत सुचलेत आणि बाजूला पडून गेलेत. त्यामागेही एक कारणमीमांसा आहे म्हणा.... म्हणजे प्रत्येक गोष किती प्रोडक्टीव आहे... ती गोष केल्याने नफा किती वगैरे ने सुरुवात होते आणि मग सुचलेले विचार आल्या पावली परत फिरतात. बघू कधीतरी नंतर असा विचार करून आतल्या आत कुढत बसतात. बाहेर पडायचे असते त्यांना पण .....
खरे तर एवढे सगळे लिहून कोणी वाचेल का? किंवा वाचलेच तर त्याचा किती उपयोग होईल असे प्रश्न असतात मनात. दरम्यानच्या काळात आपण स्वताच्याही कोशात अडकत जातो, हेही तितकेच खरे. तर लिहण्यासाठी एक फ्लो हवासतो असे म्हणतात. विचार करून ठरवून कधीच लिहिता येत नाही. अगदी खरंय हे ....
एफ. वाय. बि. एस्सी. ला Admission घेतले गेले होते. वसतिगृह आणि जेवण च्यकाटफू असल्याने खर्चचा काही विषयच नव्हता. खर्च तो काय महिन्याभरासाठी एक साबण खोबरेल तेलाची एक बाटली टूथपेस्ट आणि टूथब्रश. चहा पिनासाठी पैसे लागत पण college ला त्यावेळी canteen नव्हते व गावापासून college ४ कि.मी. लांब असल्याने फक्त चहा पिण्यासाठी ४ कि. मी. पायी जाणे परवडणारे नव्हते. कारण सायकल कोणाकडेच नव्हती. तशी कधीतरी सकाळी (बहुदा रविवारी) आमची टी partyअसायची. आमच्यापैकी बहुतेक जन पुणे विद्यापीठ पुरस्कृत कामाव व शिका योजनेत काम करत असू. त्या काम करणाऱ्यामध्ये मीही एक होतो. महाविद्यालयाच्या परिसरातील गावात कापण्याचे काम आम्ही करत असू. १० रु. तास प्रमाणे आम्हाला पैसे मिळत असत. रोजचे दोन तास काम म्हणजे २० रु मिळत ...अशा प्रकारे महिन्याचे कमी अधिक ६०० रु मिळत असत. त्यामानाने आम्ही खूप श्रीमंत होतो. बरोबर ना! ... ना खानावळीचा खर्च, ना वसतिगृहाची फी, कसलाच खर्च नाही. चक्क पैसे शिल्लक पडत! म्हणून मग रविवारी चहा partyपार्टी करत असू. अगदी दहा मित्र घेऊन गेलो तरी बिल १५ रु. झाली partyपार्टी...... अर्थातच पार्टीचा टर्न दोन महिन्यातून एकदा यायचा. म्हणजे दोन महिन्यातून १२०० रु पैकी १५ रु पार्टीसाठी बाकी किरकोळ खर्च (बुरुडशेठची जिलेबी) महिना ५०० रु मागे पडत. बचत करत होतो आम्ही! दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेतून झालेली जादान्घादानाही खूप कामी आली. पैशामुळे शिक्षण कधीच थांबत नाही.... फक्त शिकण्याची जिद्द असली पाहिजे याच प्रत्यय पदोपदी येत होता. राष्ट्रीय सेवा योजनेतील अनुभवांबद्दल नन्तर लिहील कधीतरी. असाही तो एक स्वतंत्र प्रकरणाचा विषय आहे. ... वसतिगृहात जाऊन बरेच दिवस झाले होते. आतापावेतो आमची मैत्रीही चांगली बहरली होती. सुरुवातीला वसतिगृहात राहत असताना मी बराच बुजरा होतो. घाईघाई कोणाबरोबर बोलणे मला जमले नाही. पण निसर्गातच गोंडस रूप मिळाल्यामुळे माझ्याबद्दल बहुतेकांना स्नेह वाटे. त्यामुळेच वसतिगृहात सगळ्यात जास्त माझे मित्र बनले. बसतीगृहात स्वयंपाक करण्यासाठी दोन बायका होत्या त्यांना आम्ही मावशी म्हणत असे. त्यांना पण मी खूप जवळचा वाटे. शक्यतो संपूर्ण स्वयंपाक झाल्याशिवाय कोणाल जेवायला मिळत नसे पण मला तो मान कधी कधी मिळत असे. किती गम्मत बघा या सर्व विद्यार्थ्यामध्ये मला वेगळी treattment मिळायची तरी किती भारी वाटायचे ..... आपण उगाचच खूप श्रीमंत असल्यासारखे वाटायचे. खरच होते कि ते! त्या स्वयंपाक करणाऱ्या मावश्यांच्या प्रेमाची श्रीमंती होती माझाकडे जी अजून कोणाकडेच नव्हती. मग मी श्रीमंतच ना ..... होस्टेलचे रेक्टर/ मेस म्यनेजर/ स्वीपर/ शिपाई अशी सर्व कामे करणारे श्री लान्घी. नेहमीच उपकृत असत माझ्यावर. एकूण काय त्याही परिस्थितीत स्थावर होण्यामागे या सर्व लोकांचे खूप सहकार्य लाभले. कारण मी स्थावर होईस्तोवर बरेच विदयार्थी पळून गेले होते.
F.Y.B.Sc. पास झालो. कमवा व शिका चे कामं चालूच होते. संध्याकाळी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणे हा आमचा आवडता छंद. अशा अनेक विसायांवर आम्ही वाद घातलेत. अर्थातच हे वैचारिक मतभेद असत. पण चुरस मोठी असे. त्यासाठी लागणारे मुद्दे, पुरवणी मुद्दे हे अगदी इन्स्टट असत. कारण वादाचे विषय ठरलेले नसत. ते अचानक प्रकट होत. त्यामुळे वाद घालणे आणि वाद विवाद ऐकणे यात एक वेगळीच मजा असे. संपूर्ण वसतिगृहाचे दोन भाग पडत. एक ग्रुप च्या बाजूने आणि दुसरा विरुद्ध बाजुने. असो त्यामुळे खूप ज्ञान वृद्धीही झाली हे वेगळे सांगायला नको. आपले मुद्दे पटवून देण्याचे वेगळे कला या माध्यमातून मिळाली. वादविवादात अग्रभागी असलेले सतीश चोपडे, विलास भालेराव, गणेश बारगजे, मोहन कडाळी, बाबा थोरात आणि मध्येच कॉमेडी करणारे संतोष काळे, एन. जी. नेहमी सिरिअस मूड मध्ये असणारा मनोज वदक यांना विसरणे शक्यच नाही. वसतिगृहामध्ये टीव्ही नसणे किती हितकारक असू शकते याच वस्तुपाठच मला येथे मिळाला. करमणुकीचे काहीच साधन नसल्याने असे उद्योग आम्ही करत असू. एखाद्या संध्याकाळी संगीतरजनीही जमे. सामान ठेवण्याच्या पेट्यांचे ट्रिपल बनत कुलुपाच्या किल्ल्यांची घुंगरू आणि सुरु होई गायनाची मेजवानी. आवाज कसा का असेना मनापासून गाणे म्हटल्यास ए सामोरच्या हृदयापर्यंत पोहोचते, हे हि येथेच शिकलो. बाबा थोरात चे ‘चलते - चलते मेरे ये गीत याद रखना’ आजही जसेच्या तसे लक्षात आहे. गणेश बारगजे ‘कही दूर जाब दिन ढल जाये’...... काय म्हणायचा म्हणून सांगू. डोळ्यातून पाणीच यायचे. त्यांची आणि आमच्याही! .. आणि विलास भालेराव चे ते ‘ओ हरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौनसे जल में कोई जाने ना....... जसेच्या तसे लक्षात आहे. किशोर कुमारची ओळखच मुळी मला या मंडळीनी करून दिली आणि किशोर कुमार माझे लाईफ लॉंग फेवरेट गायक बनले.
कॉलेज सकाळी असल्याने दुपार रिकामी मिळायची. दोन तास काम करूनही वेळ मिळत होता. या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे असे नेहमी वाटे. तीव्र इच्छाशक्ती तुमच्या इच्छा पूर्ण करते... इच्छा असली कि मार्ग निघतो म्हणतात. याचा प्रत्यय मला कित्येकदा आलाय. एकदा तर मी प्रयोग करून पाहिलंय. शिर्डी दर्शनाला जायचे ठरवले. निघालो घरून. खिशात बिलकुल पैसे नाही. मोटारसायकल वाल्यांकडून लिफ्ट घेत घेत पोहोचलो शिर्डी ला आणि तसाच परतलोही. कुठेही पैसे लागले नाहीत. शिर्डी ला भोजनालयात कुणीतरी पंगत दिली असल्याने तेथेही जेवणासाठी पैसे लागले नाहीत.
हा तर माझा मित्र संदीप आरोटे एका कॉम्पुटर क्लास मध्ये शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी जात असे. श्री. पराड सरांचे ते क्लास. एके दिवशी संध्याकाळी संदिप्बार्बर गप्पा मारताना मलाही काहीतरी नवीन शिकायचे आहे असा विषय निघाला. संदीप काम करत होताच. तुझ्यासारखे मलाही काहीतरी काम शोधून काढ असे संदीप ला सुचवले. मित्राने एखादे काम सांगितले आणि संदीप शांत बसेल असे शक्य नसे. दुसर्याच दिवशी त्याने काम शोधून काढले. काम करण्याची इच्छा आणि धमक हवी कामाला तोटा नाही. पण ज्याला काम करायचे नसते त्याच्याकडेही कारणांची कमी नसते, संदीपची हि वाक्य मी आयुष्यभरासाठी लक्षात ठेवलीत अगदी जशीच्या तशी. संदीप ने माझ्यासाठी शोधलेले काम एका फोटो स्टुडीओ मधील होते. कलामंदिर फोटो स्टुडीओ. प्रो.प्रा. आन्ना सावंत. स्टुडीओ मध्ये साफसफाई करणे, पाणी भरून ठेवणे, कॅमेरा ची स्वचाता ठेवणे बिलाप्रमाणे फोटो काढून देणे. हिशोब ठेवणे अशी कामे सुरुवातीला करत असे. नंतर आन्ना मधील शेठ कधी गळून गेला व तो कधी मित्र बनला हे आम्हाला दोघांनाही समजले नाही, शेठ आणि नोकर असे नाते कधीच संपले होते. त्याने मला फोटो काढायला शिकवले. सर्व कॅमेर्यांची माहिती करून दिली. फोटो डेव्हेल्पिंग करणे शिकवले. आणि विदेओ शूटिंग सुद्धा. एक वर्षात मी अगदी सराईत फोटोग्राफर बनलो तेही अन्ना सावंत च्या मार्गदर्शनाखाली. कारण अन्ना सावंत हा राजूर अकोले संगमनेर भागातील खूप नावाजलेला फोटोग्राफर होता. चेहऱ्यांचे अंगल लाईट रेफ्लेक्टीओन चे अप्रतिम ज्ञान आन्नाकडे होते. ते सर्व ज्ञान माझ्या विनयशील स्वभावामुळे आण्णाने मला दिले. अगदी कुठलाही हाताचा राखून न ठेवता. खरच आण ग्रेटच आहे. वरतून त्याची गाडी बजाज एम ८० आणि नंतर सी टी १०० वापरायला मिळायची ते वेगळेच.
एस वाय बी एस्सी ला असताना सुहास आनदगावकर राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेसाठी जाण्याच योग आला. आमच्या कॉलेजमधील शेलद या गावाचा एकनाथ यादव नावाचा एक नावाजलेला वादविवाद पटू बरोबर तिकडे जाणे झाले. हे महाशय खूप पोहोचलेले होते. खूप सार्या सामाजिक कामांमध्ये यांचा हिरीरीने सहभाग असे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर यांचे सलोख्याचे संबंध होते. एकदा तर यांनी कोलेज मध्ये स्ट्राईक घडवून आणली होती. किती रडले होते आमचे प्राचार्य टी एन कानवडे सर. विषय कितीही साधा असला तरी त्याला वेगळे रूप देण्याची व तो रंगवण्याची हातोटी या महाशयांकडे होती. त्यांच्याबरोबर मी या वादविवाद स्पर्धेसाठी गेलो आणि अजून एक बिंदू जोडला. आजपर्यंत बरोबर आणि चूक अशा दोनच गोष्टी असतात असे माझे प्रामाणिक मत होते. आणि त्याप्रमाणे मी वागतही होतो. बरोबर म्हणजे ज्याला समाज चांगले म्हणतो असे आणि चूक म्हणजे समाज ज्याला वाईट म्हणतो असे, पण या वादविवाद स्पर्धेपासून चांगले वाईट किंवा चूक बरोबर असे काही नसतेच ते तुमच्या ग्रहण शक्तीवर अवलंबून असते याच मला प्रत्यय येथे आला. आपला चुकीचा विषय कसा रेटता येतो याची झलक मला येथे पहावयास मिळाली. आणि मला भेटला नवीन बिंदू. .....
No comments:
Post a Comment