Wednesday, January 6, 2016

पिंपळाच्या झाडाजवळ.
                             ....... डॉ. अविनाश लांडगे (सांगाती)
पिंपळाचे झाड लिहिता लिहिता दोन प्रकरणे लिहून झाली. खरे तर ती कधी आणि कशी झाली ते कळलेच नाही. आयुष्याच्या प्रवासातही असे प्रसंग काय कमी वेळा येतात!  ठरवून ठेवलेली कामे करता करता अनपेक्षित धक्का देणारी सुखद घटना / कामे घडून जातात. बोनसच असतो तो म्हणा!  याचे सुख जास्त मिळते माणसाला. म्हणजे बघा न तुम्हालासुद्धा हा अनुभव आला असेल. लहानपणी कपड्याच्या दुकानात गेल्यावर दोन शिरत आवडले, त्यातला एक चोईचे करायची वेळ आली, हवे तर दोन्ही आहेत आणि दुकानदार म्हणतो कि एकावर एक फ्री आहे. कित्ती मज्जा. काय आनंद होतो ना. त्यावेळचा कोणाच्याही चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. असेच झालेय माझ्याही बाबतीत एर्हवी एखादे पण लिहायचे जीवावर येणारा मी आज चक्क दोन प्रकाराने संपवली, म्हनण्यापेक्षा कधी लिहून झाली कळलीच नाही. हा सुद्धा एक प्रवास आहे म्हणा. या प्रवासाची मजा तुम्हालाही येईल माझ्याबरोबर. कारण एव्हाना तुमाच्या लक्षात आलेच असेल कि हा प्रवास थोड्याफार फरकाने तुमचा पण आहे.
औरंगाबादचा वाद विवाद स्पर्धेनिमित्ताने सापडलेला बिंदू माझ्या आयुष्याला वळन देऊन गेला असे मी म्हटलो. पण याचा आणि पिंपळाच्या झाडच काय संबंध असे तुम्ही म्हणाल. खर तर औरंगाबाद मध्ये मला माझ्या एका वेगळ्या पैलूची ओळ्ख झाली. आजपर्यंत माझ्याकडे लोक निरागस आहे म्हणून आकर्षिले जातात असे समजत होतो. पण तसे नसून आपल्यात अजून एक गुण आहे हे माझ्या लक्षात आले ते औरंगाबाद ला. तो गुण म्हणजे लाकांना आपण जे काय सांगतो जो विषय पटवण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये लोकांना गुंतवून ठेवतो. मी जे काही बोललो ते लोकांनी लक्ष देऊन ऐकले.. त्यातून काहीतरी अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. आजपावेतो हि गोस्ज तुमच्याही लक्षात आली असणार कि आपण काही लोकांचे विचार भाषणे फार लक्षपूर्वक वाचतो, ऐकतो. तर कधी कधी समोरचा माणूस फार महत्वाच काहीतरी फार महत्वाच आहे असे माहित असूनही आपले त्या माणसाच्या बोलण्याकडे लक्ष नसते. काही वेळा रटाळ विषय वक्त्याच्या विशिष्ट गुणांमुळे विघायावर खिळवून ठेवतात, त्याच्या विरुद्धही घडतेच.
तर मी बोलता असताना लोक माझ्या बोलण्यावर किळून राहतात हे आतापर्यंत माझ्या लक्षातच आले नव्हते. मला उगाचच माझ्या निरागसपणावर अभिमान वाटे. जसजसा मोठा झालो तसतसा जगाचा खरा चेहरा दिसायला लागला. तुम्ही निरागस आहात म्हटल्यावर तुम्हाला फसवनार्यांची गर्दी तुमच्या भोवती जमा होते. या सर्वांना आधार मिळाला तो कथाकथन स्पर्धेने. या कथा कथन स्पर्धेमध्ये मी पिंपळाच्या झाडाची गोष सांगितली होती. खरे तर हे पिंपळाचे झ्झाद मला सापडले होते फोटोग्राफी करत असताना. त्याचे झाले असे-
राजूर मध्ये कानकाटे मंडळी तशी मालदार पार्टी. त्यांच्यापैकीच कोणाच्यातरी मुलाच्या लग्नाच्या शुटींग च्या निमित्ताने मी आणि विकास देशमुख वैजापुरला गेलो होतो. फोटोग्राफर बद्दल प्रचंड ग्ल्यामर असते हे एव्हाना माझ्या लक्षात आले होते. याची दोन तीन कारणे आहेत. एक तर क्यामेर्याबद्दल उत्सुकता असते. आपण फोटोग्राफरशी जवळीक केली तर तो आपला फोटो चांगला काढील किंवा तो गर्दीमध्ये आपल्यावर झूम करेल किंवा फोकस करेल अशी भाबडी अपेक्षा. आणि मुळातच फोटोग्राफर हा फ्रेश मूड मध्ये असणे गरजेचे असते. त्याला त्याची कामे दुखी कष्टी चेहऱ्याने किंवा वैतागलेल्या चेहऱ्याने करून चालणार नाही.कारण त्याच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभाव त्याच्या कामावर पडतो. त्याच्या चेहऱ्यावरच्या भावभावनानुसार समोरची व्यक्ती भावमुद्र देत असते. म्हणून त्याला त्याचा मूड नेहमी ताजातवाना सदाहरित ठेवावा लागतो. ठेवावा लागतो म्हणण्यापेक्षा तो राहतो याचेही एक कारण आहे. समोर एवढी ‘हिरवळ’ फिरा असताना याची काय बिशाद मोड खराब होउ देण्याची. नेहमीप्रमाणे मी आणि विकास आळीपाळीने कधी शूटिंग तर कधी फोतोग्रफी  करत होतो. विकास ‘हिरवळ’ पाहण्यात दंग होता. लग्नात हरखून जाण्यासारख्या गोष्टी असतातच की ! आपल्या सगळ्यांना अनुभव आहेच. हा अनुभव घेण्यासाठी लग्न करण्याची गरज नसते. फक्त कोणाच्यातरी जवळच्या व्यक्तीच्या लग्नाला जावे लागते. बरोबर ना! त्यातल्या त्यात करवला म्हणून गेला तर काय विचारायलाच नको.
या लग्नाच्या वेळी मी काहीसा माझ्याच कोशात होतो. चार दिवसांनी कॉलेज मध्य कथाकथन होते. मला औरंगाबादला सापडलेल्या माझ्या गुणाची ‘खरच मी लोकांना माझ्या बोलण्याच्याभोवती खिळवून ठेवू शकतो का?’ या (बिंदूची) प्रचीती  confirmary test घ्यायची होती. कॉलेज मधील कथाकथन स्पर्धेसाठी मी माझी उमेदवारी दिली होती. कॉलेज मध्ये आर्ट्स व्हर्सेस सायन्स अशी चुरस चालत असे. त्यावेळी कॉमर्स शाखा सुरु झालेली नव्हती. कथाकथनाच्या स्पर्धेदरम्यान वेगवेगळ्या न ऐकलेल्या कथा ऐकावयास मिळत म्हणून प्रचंड गर्दी असे. साधारणता गोष्ट ऐकायला लहानापासून सानांपर्यंत सर्वांनाच आवडते ना, म्हणून बाकी इतर कोणत्या स्पर्धेला असो व नसो या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभत असे. हॉल खचाखच भरलेला असे. या निमित्ताने आपली ओळख कॉलेजभर करण्याची हि एक नामी संधी असे. पण जर का कथा आपटली तर काही सांगायला नको, तुम्ह समजू शकता. .... समोरच्याने न मारताही मार कसा खाल्ला जातो याचा अनुभव प्रत्यकाच्या आयुष्यात असतोच तो आपण एक्सप्लेन नाही करू शकत.
मी लग्नाची शूटिंग करत असताना कोणती कथा सांगायची यावर विचार करत होतो. सकाळपासून एक चोठासा मुलगा साधारण २-३ वर्षाचा असेल सारखा माझ्या मागे मागे दादा-दादा करत फिरत होता. मी मध्याच त्याच्यापासून सुटका करून घेत तर कधी त्याचे मनोरंजन करत माझे काम करत होतो. तो मुलगा कोणाचा आहे/ होता हे काही मला शेवटपर्यंत कळले नाही. तो दिवसभर माझ्या मागे मागे फिरत राहिला. अगदी जेवतानाही माझ्या ताटात जेवला. त्याची दादा-दादा, दादा-दादा ची हाक सारखी माझ्या कानावर येत राहिली. बिदाई ची वेळ आली तरी तो मुलगा माझ्या मागे मागे फिरत होता. तो बाकी काहीच बोलत नव्हता. फक्त एकाच रट दादा-दादा, दादा-दादा.
बिदाई सुरु झाली. मुलगी रडू लागली, मिलीची आई, वडील, भाऊ, बहिण सर्वच रडू लागले. हा इमोशनल सीन माझ्या आयुष्यात खूप वेळा आलाय कारण बर्याच लग्नांची बिदाई मी माझ्या कॅमेर्यामध्ये कैद केलीय. हे सर्व करत असताना मी प्रत्येक बिदाईच्या वेळी मुसमुसून रडलोय. एकदा तर एका अनोळखी लग्नात माझ्या बिदाई चा सीन रेकार्ड करत असताना माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून नवर्या मुलीने हसून दिले होते. तिला हसताना पाहून माझ्याकडे बघून सर्व वर्हाडी मंडळी आणि मुला मुली कडील मंडळी हसत होती. याही बिदाई च्या वेळी माझी डोळ्यात अश्रू होते. आणि तो छोटा मुलगा जो सकाळपासून माझ्या मागे मागे फिरत होता तोही माझ्याकडे बघून रडत होता. ते ओअहून मला आणखीच रडू आले. कारण खर्या अर्थाने आमच्या बिदाईची वेळ झाली होती. तो परत कधी भेटेल कि नाही हेसुद्धा माहित नव्हते. शेवटपर्यंत तो मुलगा कोणाचा त्याचे आई वडील कोण हे मला काही समजू शकले नाही. आणि तो गायब झाला. बहुदा बिदाई नंतर ब्याग भरण्याच्या गडबडीत त्याचे आईवडील त्याला घेऊन गेले असावेत.

मला कथा सापडली होती. कधीतरी इंग्रज राजवटीत अस्पृश्य लोकांवर होणार्या अत्याचारांबद्दल मी वाचले ऐकले होते. असाच एक अस्पृश्य बाप आणि त्याचा मतीमंद मुलगा ज्याला फक्त बाबा बाबा म्हणता येते, यांच्याभोवती हि कथा गुंफायची असे मी मनोमन ठरवले आणि पुढील लग्नाच्या शूटिंग साठी भटक्या जमातीच्या जगण्याच अनुभव घेत आलेफाटा बारा बंगला येथे निघालो. नवीन बिंदूच्या शोधात......... 

No comments:

Post a Comment