एन जी . ..... डॉं अविनाश लांडगे (सांगाती)
आयुष्य कोणाचेही असो, कॉलेज चे दिवस प्रत्यकाच्या आयुष्यात यायलाच
हवे. असे माझे प्रामाणिक मत आहे. म्हणजे शाळा कॉलेज चा हाच तो एक काळ असतो जेथे
सर्व लेबल्स गळून पडलेले असतात. गरीब, श्रीमंत, हुशार, मठ्ठ, आणि बरेच काही.
स्वच्छंदी जगण्याचा, खरे जीवन जगण्याचा तोच एक काळ असतो. वार्यावर स्वर झालेले
तारुण्य, स्वैर विचार करण्याचे व त्यानुसार अनुकरण करण्याचे हेच ते काय दिवस
असतात. नंतरचा काळ माणसाला एका बंदिस्त चौकटीत बंद करतो. बर्याच वेळा हि चौकात
तोडण्याचा प्रयत्न होतो, केला जातो. पण कालानुरूप ती अधिकाधिक घट्ट होत जाते.
चुन्याच्या बांधकामासारखे, जेवढे जुने होईल तेवढे ते पक्के होत जाते.
राजूर कॉलेज चे दिवस खरेच मंतरलेले दिवस होते. कॉलेज मध्ये
माझ्या आत्मविश्वासात भर पडायला आणखी एक व्यक्ती होती, .... एन. जी....... एन जी
आणि मी भेटलो तो क्षण स्पष्टपणे आठवत नाही. पण जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही वेगळे
नाहीच आम्ही एकरूप आहोत याची खात्री मनोमन पटली. आमचे सारखे आडनाव कारणीभूत असेल
कदाचीत या गोष्टीला. कुनितरी माझ्याच आडनावाचा मुलगा होस्टेल मध्ये राहतो एवढे मला
कळले होते. आम्ही एका खोलीत (१२ बाय १५ ची खोली) १२ लोक राहत असू. जगामध्ये भावनिक
सहचर्याचा दुसरा आदर्श शोधून सापडणार नाही. आम्ही पाच खोल्यांच्या त्या
वसतिगृहामध्ये ६० लो राहत होतो. खरे तर त्या खोल्या महाविद्यालयातील शिपायांसाठी
महाविद्यालय परिसरात राहन्यासाठी
बांधलेल्या होत्या. त्याच पाच खोल्यांचे रुपांतर वसतिगृहात करून तेथे ५०-६०
मुलांची सोय केली होती कानवडे सरांनी. आम्ही सर्व जाती धर्माचे लोक येथे
गुण्यागोविंदाने राहत असे. होस्टेल मध्ये शक्यतो भांडण कधीच झाले नाही. म्हणूनच
आदर्श सहचर्य असे नाव मी म्हणालो. वसतिगृहातील प्रत्येक मुलगा गरजू होता, विशेष
म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी.धडपडणारा होता. त्यापैकी मीही एक होतो यात वाद
नाही. कोणी कितीही म्हनुद्यात पण परिस्थिती माणसाला विनयशील बनवते असा माझा
प्रामाणिक अनुभव आहे. हाच विनाय्शिल्पना माणसाला आयुष्यभर पुरतो सुद्धा. म्हणून
आम्ही पुढील आयुष्यात कधीच खचलो नाही. प्रत्येक उपरात परिस्थिती आपल्यामध्ये पैलू
पडण्यासाठीच निसर्गाने तयार केलेली असते अशी माझी ठाम श्रद्धा आहे. या सर्व बरोबर
माणसाने कधीच जुने दिवस विसरता कामा नये, कि शिकवणही आम्हा सर्वांना याच सहचर्यातून
मिळाली......
एन जी होस्टेल मध्ये भेटला आणि आमचा ऋणानुबंध कायमचा बांधला
गेला. आत्मविश्वास जागविण्यासाठी एन जी एक महत्वाचा दुवा ठरला असे मीन म्हणालो.
याचे कारण एन जी अंगापिंडाने माझ्यापेक्षा उंच होता. त्याची जन्म तारीख
माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान होती तरी तो मोठा दिसे. साहजिकच होस्टेलमध्ये मुले
आम्हाला मोठा आणि छोटा लांडगे म्हणत असत. न.जी मोठा दिसत असला तरी प्रत्येक गोष्ट
मला विचारून करत असे. नंतरच्या काळात मोठा लांडगे चे नामकरण त्याच्या इनिशियल्स
वरून एन. जी. असे झाले. अडचणीच्या काळात मीही नेहमी त्याच्या मागे सावली सारखा उभा
राहिलो. अगदी त्याचे लग्न होईपर्यंत. त्यानेही तेवढ्याच श्रद्धेने माझ्या गोष्टी
ऐकल्या. माझे कुणी तरी ऐकतय, मी सांगितलेल्या गोष्टी कुणीतरी फोलो करतयं यात एक वेगळेच
समाधान aअसते. ते समाधान एन. जी. ने मला दिले आणि त्यामुये माझा आत्मविश्वास
वाढन्यासाठी नाक्किच मदत झाली.
उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत तो नेहमी माझ्या घरी
असे. आम्ही अशा सुट्ट्या एकत्र घालवलेल्या आहेत. शेतात एकत्र काम केले.
रोजन्दारीनेही कामाला गेलो सुटी संपत आली कि मिळाले पैसे घेऊन आम्ही एन जी च्या
गावी जात असू. तेथे दोन तीन दिवस राहून पुन्हा कॉलेज ला परतत असे. कॉलेज ची फीस,
वह्या पुस्तके, प्रवस खर्च यासाठी हे पैसे पुरत. कमी पडलेले पैसे माझी आई एन जी ला
देत असे.
एन जी माझ्या मनात घर करून राहिला तो वेगळ्या कारणाने.
विश्वासाचे अप्रतिम उदाहरण होऊ शकेल हे. आम्ही एस.वाय ला असताना माझ्या मावस
बहिणीच्या लग्नानिमित्त राजुर्हून साधरण ३५ कि,मी. धांदरफळ या गावी गेलो होतो. ते
ठिकाण माझ्या गावापासून १० कि मी अंतरावर आहे. त्या दिवशी प्रक्टीकल परिक्षेचा शेवटचा
दिवस होता. परीक्षा संपायला थोडा वेळ लागला.लग्न दुसर्या दिवशी होते. तरी आम्ही
साधारण पाच वाजेच्य सुमारास राजुराहून निघालो. भाडयासाठीचे पैसे होते त्यामुळे टी
चिंता नव्हती, एर्हवी टी चिंता पहिली असे. लग्नाच्या ठिकाणी गाड्या बदलत जाने भाग
असल्याने आम्हास थोडा उशीर झाला होता. साधारण ७ कि मी ची पाय्पितही करावी लागणार
होती. लग्न ठिकाणी जाण्यासाठी आम्हास धांदरफळ गावाजवळील प्रवरा नदीमधून जावे
लागणार होते. मजल दरमजल करत आम्ही धांदरफळ फाट्यावर पोहोचलो. तेथून तीन कि मी पायी
गेल्यावर नदी होती. त्यानंतर मावशीचे घर. जेथे उतरलो तेथून विरुद्ध दिशेला पाच सात
कि मी वर माझे घर. संध्याकाळ होऊन अंधार पडला होता. आता आपण पायी जरी गेलो तरी
एखाद्या तासात पोहोचू असा विचार करून आम्ही नदीच्या दिशेने निघालो. कॉलेज
सुटल्यावर आम्ही तडक निघालो असल्याने आमच्याकडे काही कोणती ब्याग वगैरे नव्हती.
चालत जाऊन प्रवरेतीरी पोहोचलो आणि मी तर बसूनच घेतले. नदीमध्ये भंडारदरा धरणातून
शेतीसाठी पाणी सोडलेले जाते. नेमके त्याच वेळी आवर्तन सोडलेलं असल्याने नदीमध्ये
पाणी होते. आता परत माझ्या घराकडे जायचे म्हणजे आठ ते दहा कि मी पुन्हा पायपीट करावी लागणार. जर नदी पार केली
तर २ कि मी वर मावशीचे घर. बरं परत घरी जरी गेलो तरी उद्याच्या लग्नासाठी घरचे सर्वजन मावशीच्या घरी आले असणार आणि उद्या
परत लग्नासाठी यायचे म्हणजे हीच पायपीट करत यावी लागणार.
मी एन जी ला विचारले, “काय करूयात?” लहानपणी मामाच्या घरी जाताना बर्याचदा मी हि नदी पार केलील होती पण त्यावेळी
आई बरोबर असे. आई ला या नदीचे सर्व उतार माहित होते. पण आता परिस्थिती बदलली होती.
सततच्या वाळू उपश्यामुळे कोठे खड्डा असेल याची शाश्वती नव्हती. काय करावे सुचेन.
एन जी ने नेहमीप्रमाणे कोणताच निर्णय दिला नाही. “तू जे म्हणशील ते करूयात” असा निर्णय त्याने दिला. त्या अंधारात मला
नदीच्या पाण्याचा अंदाजही बांधता येईना. लाईट गेलेली होती. बहिणीच्या लग्नाला
जाण्याची अनावर इच्छा, शिवाय सर्व नातेवाईक तेथे भेटणार, मग काय भावनिक निर्णय
झाला. अशा वेळी भावना बुद्धीवर सरस ठरतात. निर्णय झाला नदी पार करायची.
आदर्श पुरुषांच्या कथा ऐकताना, सानेगुरुजी, वीर सावरकर जसे
पोहून नदी पार करत, पोहताना कपडे डोक्याला बांधत त्याप्रमाणे हे धाडस करण्याचे
आम्ही ठरवले. ठरल्याप्रमाणे आम्ही दोघांनीही कपडे काढले व डोक्याला बांधले आणि
आम्ही नदीत प्रवेश केला. एक तृतीयांश नदी पार करेपर्यंत पाणी छातीला लागले होते.
एन जी ला पाण्याचा काहीच अंदाज नव्हता नव्हे तो वाहती नदी प्रथमच पार करत होता.
आम्ही पुढे पुढे सरकत होतो. आता नदीपात्रातील वाळू आमच्या पायाखालून सरकतेय याची
आम्हाला जाणीव झाली. मी पुढे आणि एन जी मागे असे आम्ही एकमेकांचे हात धरून चाललो
होतो. वाळू सरकाल्याची व प्रवाहाचा वेळ वाढल्याची जाणीव मला झाली एव्हाना पाणी
आमच्या हनुवटीपर्यंत लागले होते. आता पाणी आम्हाला ओढू लागले होते आम्ही नदीच्या
बरोबर मध्यभागी उभे होतो. नदीला पाणी सोडल्यावर दिवसभर विजेचे लोडशेडिंग असे.
त्यामुळे नदीकाठी एकही विजेचा दिवा लागलेला नव्हता. नदीच्या किनार्यावर माणसांचा
मागमूसही नव्हता. आता आम्ही नदीमध्ये वाहून जाणार याची पुरेपूर खात्री मला पटली.
पाणी माझ्या कानाला व नाकाला लागले होते. एन जी थोडा उंच असल्याने पाणी त्याच्या
हनुवटी पर्यंत लागले होते. आम्ही मागेही फिरू शकत नव्हतो.कारण मागे फिरताना थोडा
जरी मार्ग चुकला तरी शंभर टक्के आपण वाहून जाणार याची खात्री होती. “अवि, वाळू जोरात सरकायला लागलीय” नदीपात्रात उतरल्यापासून एन जी पहिल्यांदाच
बोलला. मीही त्याला “हो खरय” एवढेच बोललो. आतापर्यंत आपण वाहून जाणार याची
मला पूर्ण काल्पना आली होती. मला पोहता येत होते, जरी वाहून गेलो तरी तरी आपण
तरंगून राहिलो तर नक्की वाचू याची खात्री मला होती. याच नदीत मी पोहायला शिकलो
होतो. आम्ही एका जागी स्तब्ध होतो. पाण्याच वेग वाढत होता. काय कराव सुचेना.
आरडाओरडा करून पहिला पण आजूबाजूला कुणीच नव्हते. मी एन जी ला म्हणालो “जरी आपण वाहून जायला लागलो तरी फक्त तरंगून राहायचे. प्रवाह पार करण्याचा
प्रयत्न करू नको. त्यामुळे आपण थकू आणि बुडू त्यापेक्षा फक्त तरंगून राहण्यासाठी
आपल्याला कमी शक्ती लागेल आणि आपण जिवंत राहू शकू.”
“मला कुठे पोहता येतेय” एन जी म्हणाला. तशाही परिस्थितीत मला घाम फुटला. मी एन जी च्या निरागस
चेहऱ्याकडे त्या अंधारातही पाहू लागलो. काय बोलावे मला कळातच नव्हते.
“अरे मग तू नदीमध्ये उतरून नदी पार करायला कसा
काय तयार झालास?” मी त्याला विचारले.
“तू मला कधीच बुडू देणार नाहीस याची मला खात्री
आहे. तू म्हनास नदी पार करूयात, मी तुला कधी नाही म्हणूच शकत नाही” -एन जी.
आता सुन्न होण्याची वेळ माझी होती. केवढी मोठी हि जबाबदारी.
येथे काही बरे वाईट झाले तर. तशाही परिस्थितीत माझे हातपाय गळाले.
श्रद्धा यापेक्षा काय वेगळी असेल हो. संपूर्णपणे त्या
परमात्म्यावर आपला भर टाकून तो जसे घडवेल तसे घडायचे......... कोणतीही तक्रार न
करता....... तो परमात्मा काहीतरी करतोय तो योग्यच करत असणार, ....... असेच असेल का
काही? एन जी ने माझ्यावर श्रद्धा ठेवली होती. मी
त्याला कधीच बुडू देणार नाही.या श्रद्धेने मला अधिक जबाबदार बनवले. असेच होत असेल
बहुदा देवाचे सुद्धा. जर भक्ताने १००% विश्वास आणि श्रद्धा ठेवली तर काय बिशाद आहे
देवाची त्याची इच्छा पूर्ण न करण्याची. त्याला टी पूर्ण करावीच लागेल!.
मी लगेच स्वतःला सावरले. एन जी ला धीर दिला “घाबरू नकोस काहीही होणार नाही.” थोडा वेळ आहे त्या परीस्थितीत उभा रहा माझा
खांदा सोडू नकोस. आणि मीही त्याचा हात घट्ट धरून ठेवला. साधारण पाच ते दहा मिनिटे
आम्ही तसेच उभे होतो. मी मनातल्या मनात देवाचा धावा करत होतो. मी घाबरलोय हे एन जी
ला कळू न देण्याची पुरेपूर खबरदारी मी घेतली.
साधारण दहा मिनिटांनंतर नदी किनार्यांच्या घरांमध्ये लाईट
लागले. याचा अर्थ लाईट आली होती. लोडशेडिंग मुळे नादिकीनार्यावरचे सर्व वीजपंप बंद
होते. ते चालू करण्यासाठी लोक नक्की नदीकिनारी येतील..... माझा अंदाज खरा ठरला.
दुरून विजेर्या (Battery) चमकू लागल्या. आता आम्ही ओरडायला सुरुवात केली. काका, मामा, बाबा, तोंडात
येतील ते शब्द आम्ही जोराने ओरडत होतो. आमचे शब्द किनार्यापर्यंत पोहोचले. आणि एक
शेतकर्याने आमच्यावर विजेरी (ब्यटरी) रोखली. काय प्रकार आहे त्याच्या क्षणार्धात लक्षात
आला. “आम्हाला किनार्यावर यायचे आहे. आमची मदत करा.” आम्ही ओरडत होतो.
“थोडा वेळ आहे तसेच थांबा, किनार्यावरच्या वीजपंप
आता चालू होतील आणि पाण्याची पातळी खाली जाईल मग मी जसजसा battery च्या प्रकाशाने रस्ता दाखवेल तसे तसे तुम्ही या” त्याने धीर दिला.
माझ्या जीवात जीव आला आणि खरच पंधरा वीस मिनिटात पाण्याची
पटली खाली गेली, आणि त्याने म्हटल्याप्रमाने त्याने दाखवलेलेल्या प्रकाशझोतात
आम्ही नदी पार केली. बाहेर आल्यावर एकमेकांच्या गळ्यात पडून स्तब्ध उभे होतो.
डोक्याचे कपडे सोडले. थोडावेळ तसेच उभे राहून अंग कोरडे होऊ दिले. कपडे घालून
शेतकऱ्याचे आभार मानून लग्नाच्या दिशेने निघालो. या बिंदू ने मला खर्या श्रद्धेचा
आणि विश्वासाचा अर्थ समजावला........
(१२.१२.२०१५)
No comments:
Post a Comment