Wednesday, January 27, 2016

जागल्या....... डॉं. अविनाश लांडगे (सांगती)

जागल्या
.... डॉं. अविनाश लांडगे (सांगाती)
काळ परवा सहज न्यूज च्यानल सर्फिंग करत असताना एक आशावादी बातमी झळकली. जळगाव जिल्ह्यातील पारोळा गावातील काही विद्यार्थी (ज्यांच्या वडिलांनी आत्महत्या केल्या होत्या) गावागावात जाऊन दिंडी रूपाने प्रबोधन करत आहेत. माझ्या मनाला हि गोष्ट चटकन भावली. अर्थातच मीही शेतकऱ्याच पोर आहे. नेहमीच्या सवयीने त्या गोष्टीवर मनात मंथन सुरु झाले. आत्महत्या करणे वाईटच...... त्याबद्दल मतभेद असण्याचे कारण नाही. पण का होत असतील आत्महत्या !... आत्महत्या रोखण्यासाठी असा उपक्रम वारकरी संप्रदायाने हाती घेणे नक्कीच अशादायी आहे. नव्हे, भूतकाळात हे काम याच संप्रदायाने नेटाने लावून धरलेले दिसून येते. आपले भविष्य नेहमीच आशावादी, ध्येयवादी ठेवावे, त्यामुळे जगण्यासाठी उर्जा मिळते. हा आशावाद संत साहित्याने व वारकरी संप्रदायाने नेहमीच प्रफुल्लीत ठेवण्याचे काम केले आहे.
माझ्या लहानपणी आमच्या गावात भराडी म्हणून एका जमातीचे लोक येत असत. तसे हे लोक वर्षातून फक्त एकदाच येत. त्यात भराडी, नंदीवाले, वासुदेव अशी मंडळी असत. या सर्वांबद्दल गावकर्यांमध्ये कमालीची आपुलकी दिसून येत असे. एक चम्पाभर (आठवाभर) धान्य मग ते कोणते का असेना हे लोक प्रत्येक घरातून गोळा करत असत आणि बदल्यात वर्षभरासाठीच आशावाद प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात जागवून जात (सर्वांचे भविष्य सांगण्याचे काम करत). म्हणून त्यांना दिलेले ‘जागल्या’ हे नाव यथायोग्य आहे असे मला वाटते. त्यातल्या भराडी मंडळीवर माझे विशेष लक्ष असे.
अंगाने उंचापुरा, रुंद छाती, खांदे मजबूत, मिशांना सतत ताव मारण्याची सवय, जड भुवया, डोक्यावर फेटा पायात मेंधापालांकडे असतात तशा जड जड चपला, असा नजरेत भरणारा पेहराव या भराडी बुवांचा असे. डोळ्यात डोळे घालून बोलण्याची सवय त्यामुळे तो खोट बोलतच नाही मुली असा प्रत्येकाचा विश्वास. डोळ्याला डोळे भिडवून बोलण्याच्या व आवाजातील करडेपणा मुळे समोरचा लगेच संमोहित होई. मध्येमध्ये तुळजाभवानी व अंबाबाई च्या नावाचा जयघोष चालू असे. ५०-६० किलो धन्य तो दिवसाकाठी जमवत असे आणि ते त्याचे भक्कम खांदे हे सर्व उचलण्यास अर्थातच समर्थ होते.हा नेहमी पायी फिरे. त्यामुळे त्याच्या जाड जाड वाहणा त्याला नेहमी साथ देत असत. काळानुरूप तो नंतर सायकलवर येऊ लागला होता.
माझ्या घरी अठरा विश्वे दारिद्र्य होतेच. मजुरी शिवाय पर्याय नव्हता. वडील नेहमी मजुरीसाठी दुसर्याच्या बांदावर उभे. अर्थातच त्यामुळे आलेले नैराश्य कधीकधी मुलाबाळांवर निघे. ....... आणि मग आईलाही या गोष्टी नकोशा होत. काय आहे जगण्यामध्ये. असच’ मरणार का आपण. आणि नेमका अशाच वेळी वरील पैकी एखादा जागल्या येऊन हि आशावादाची ज्योत पेटवत असे.
नेमके नाव आठवत नाही पण शांताराम किंवा सखाराम तत्सम काहीतरी नावाचा हा भराडी आमच्याकडे उन्हाळ्याच्या सुटीत येत असे. मग घराच्या ओट्यावर बसून आहे का कुणी घरात, माझा वाट घ्यायला आलोय अशी हाक तो मारत असे. नेहमीप्रमाणे चम्पाभर (आठवाभर) धान्य घेवून आई बाहेर येई आणि त्याच्या झोळीत ओतत असे आणि आम्हा मुलाना घेऊन अंगणात बसत असे. हा भराडी मग वर्षभराचे भविष्य सांगण्यास सुरुवात करत असे. त्यात वडिलांबद्दल कोद्कौतुकाचे काही वाक्य असत.
     मालक तुमचे खूप तापत माई
     राग आल्यावर सहन होत नाही
     कष्ट करायला रावण हाय
पण खोट कधी सहन होत नाय
वडील कधीतरी शेजारी बसलेले असत मग तो म्हणे
     लई मोठ मन हाय तुमच भाऊ
लोक फायदा घेतात तुमचा भाऊ
आयुष्यात लई कष्ट केले तुम्ही भाऊ
कुणाबद्दल वाईट चिंतीत नाय तुम्ही भाऊ
पण तुमच्याविषयी वाईट करत्यात लोक भाऊ
पैसा लई कामावतेत तुम्ही भाऊ पण पैसा टिकत नाय
लई मेहनत करून काम होत नाय भाऊ
तोंडापाशी आलेला घास निघून जातोना भाऊ
देवावर लई श्रद्धा आहे तुमची भाऊ
पण देवाबद्दल तक्रार बी हाय तुमची भाऊ
पण येच्यात देवाचा देवाचा दोष नसतंय भाऊ
नशीब लई जोरात हाय तुमच भाऊ
सुख समाधान अन बक्कळ पैसा
लिहून ठेवलाय देवान भाऊ
लाथ मारणार तिथ पाणी काढणार तुम्ही भाऊ.......
मग आईकडे वळून यंदा पाउस पाणी चांगला हाय माई. पुढच्या वर्षी अंगणात फटफटी (मोटारसायकल) दिसणार मला. आणि हे जर का खोट झाल तर हा सखाराम मिशीवर पिळ मारायचा बंद करेल माई......
शेवटची फटफटी ची आशा लाऊन सखाराम उठत असे आणि भेटू परत पुढील वर्षी असे म्हणे. जाता जाता आई उगाचच हा माझा मोठा मुलगा म्हणून माझा हात त्याला दाखवी. मुलाच्या हातातील धनरेषा गुप्त आहे (धनरेषा नाहीच माझ्या हातात) ती दिसत नाही. धनरेषा गुप्त आहे माई, गंगेच पाणी आटलं पण या पोराच्या हातातील पैसा कधी आटणार नाही. याच भविष्य फार उज्ज्वल आहे असे म्हणून सखाराम निघून जाई.
असा काही उत्साह संचारे सर्व घरात, घरातील सर्व नैराश्य त्या सखारामच्या येण्याने झात्खून जाई. पुढील वर्षी फटफटी येणार या कल्पनेने सर्व घर दुप्पट उर्जेने कामाला लागे. अशी महिने दोन महिने जात नाही कि पुन्हा कुणीतरी असाच जागल्या पुन्हा एकदा संपूर्ण घराला जागे करण्यासाठी येई. यावेळी मात्र गोष्ट वेगळी असे. ‘सध्या साडेसाती चालू आहे, कोणत्यातरी ग्रहाणे कोणत्यातरी ग्रहावर आक्रमण केले आहे. थोडे सबुरीने घ्यावे लागेल असा उपदेश करून हा निघून जाई.
माझ्या आठवणी नुसार साधारण नारा वर्षे अशीच पुढच्या वर्षी फटफटी नक्की. या आशेवर आईने कष्ट सोसले. बाराव्या वर्षी मात्र आईचा बांध फुटला. आणि ती त्या जगल्यावर ओरडली. काय खोट बोलतोस, दरवर्षी सांगतोस पुढच्या वर्षी फटफटी नक्की फासिवातोस व्हाय रे मला भाबडीला. जा तू बोलू नकोस माझ्याशी. आतापावेतो एवढ्या वर्षाचा ऋणानुबंधाने जागल्या देखील घराशी जोडला गेलेला असतो. घरातील सर्व सुख दुःख त्याला माहित झालेली असतात. गावातील भावकी सह सर्व इत्यंभूत माहिती त्याला या न त्या मार्गाने मिळालेली असते. कोणी कोणाल कसा त्रास दिला वगैरे त्याला माहित असते. आईच्या या बोलण्याने त्याच्याही डोळ्यात पाणी आले. पण हा भराडी मला  भावला तो एका गोष्टीमुळे, त्याने हर मानली नाही. तो पुढे म्हणाला, माई, तू माझ्या बहिणीसारखी, बारा वर्षापूर्वी तुझा हात जेव्हा मी पहिला तेव्हाच जीभ चाच्रली माझी. बारा वर्षाची कमी अधिक साडेसाती होती तुम्हाला, याच वर्षी टी संपली. मुलाचे शिक्षण संपले आहे आता सुगीचे दिवस सुरु झालेत. निराश होऊ नकोस, तुझ्या सोन्यासारख्या दिवसांच्या जवळ तू पोहोचली आहेस. थोडी कळ सोस.यंदा धान्याच्या राशीनी खळ भरून जाईल. तुझी कोणती म्हणून कोणती तक्रार राहणार नाही. पुन्हा एकदा दुर्दम्य आशावाद आईच्या मनात जागवण्यामध्ये हा यशस्वी झालेला असे. जाताना मात्र या वेळी या वर्षीचे धान्यही पुढील वर्षीच घेऊन जाईल असे म्हणून तो दिसेनासा झाला. पुढील वर्षी वडिलांनी जुनी का होईना एक राजदूत मोटारसायकल विकत घेतली. आईच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आयुष्याचे चीज झाल्यासारखे वाटले तिला.   
अगदी हेच काम वारकरी संप्रदायानेही केले. दरवर्षी गावात असणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताहात कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांनी शेतकरी जनतेमध्ये सचोटीची, चिकाटीचे व सबुरीचे बीज रोपण केले, याच आशावादावर शेतकरी तरला, जगला. दुःखाचे दिवस जातील, सुखाचे दिवस नक्की येतील पुढील वर्षी हरीनाम सप्ताहात यावर्शिपेक्षा दुप्पट देणगी या कार्यक्रमासाठी जमा होणार आहे. कारण हे क्षेत्र एक पुण्यक्षेत्र म्हणून उदयाला येणार आहे धनधान्य कधीच कमी पडणार नाही याची मला खात्री आहे असा आशावाद जागवून काल्याचे कीर्तन संपत असे आणि संपूर्ण गाव चैतन्यमय होऊन जाई. नव्या जोमाने कामाला लागे. गावातील एकीचे दर्शन त्यावेळी होई. गावात आडल्या नाडल्या साठी संपूर्ण गाव धावून जात असे. ‘संपूर्ण गाव एखाद्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे म्हटल्यावर काय हिम्मत आहे कोणाची आत्महत्त्या करण्याची. नव्हे तसा विचार सुद्धा कोणाच्या मनाला शिवणार नाही’.
कीर्तनकाराचा एक विश्वासाचा शब्द व आशावाद सर्वांना एकत्र बांधून ठेवायचा आणि म्हणून ‘मी वेगळा माझ दुःख वेगळ’ असा विचार सुद्धा कोणाच्या मनाला शिवत नसे. त्या साठी आत्महत्या हि तर फार दूरची गोष्ट.
मग आता काय बिघडलय! का करतात लोक आत्महत्या. काळानुरूप चित्र बदलले, काहीतरी घोळ केला या नवीन पिढीने..... सगळाच घोटाळा होऊन बसलाय .....

(२६ जाने.२०१६) 

Tuesday, January 19, 2016

पिंपळाच झाड ....... सांगाती


पिंपळाचे झाड....... डॉं. आविनाश लांडगे (सांगाती)
भटकती हा माझा आवडता छंद. लहानपणी वडिलांच्या धाकामुळे मी कधीच बाहेर पडत नसे. एक दोनदा प्रयत्न केला होता, पण नंतर खूप मरे खावा लागला होता. वडील खूप तापट स्वभावाचे असल्याने, त्यांना राग आल्यावर स्वतावरचा ताबा सुटत असे. मग मात्र काय होईल याची कोणालाच शाश्वती नसे. मी असा मार अनेक वेळा खाल्ला आहे. त्यांचा राग शांत झाल्यावर त्यांना त्याचा पश्चाताप होई आणि मग वडिलांना रडू अनावर होई व ते दूर शेतात जाऊन एकटेच रडत बसत.कित्येकदा मी त्यांचे अश्रू पुसून त्यांना घरी घेऊन आलो आहे. मोठा झाल्यावर मात्र फोटोग्राफीच्या निमित्ताने माझी भटकंतीची पुरेपूर हौस झाली. एकतर फिरायला मोटारसायकल मिळत असे. जेवणासाठी पैसे आणि पगार वेगळा. शिवाय लग्नसराई नेहमी उन्हाळ्याची सुटी किंवा दिवाळीची सुट्टीत असल्याने कॉलेज ला दांडी मारण्याचा प्रश्न येत नसे. मी खूप भटकलो, निरनिराळे प्रदेश पाहिले. तेथील लोक पाहिले. चालीरीती बघितल्या, लोकालोकांमधील द्वेष, मत्सर अनुभवले.
     कथाकथनाच्या निमित्ताने पिंपळाच्या झाडाची कथा सुचली. सुचली म्हणण्यापेक्षा मी ती कुठेतरी वाचली किंवा पहिली असण्याची शक्यता जास्त आहे. पण ती कथा मात्र मी गुंफली. कॉलेज जीवनात चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळ्या आम्हाला खूप आवडायच्या.बर्याचशा तर माझ्या तोंडपाठ झाल्या होत्या.त्या चारोळ्यांची मदत मी कथाकथनात घ्यायचे ठरवले आणि मनाशी एक कथा गुंफली. मी आजपर्यंत कोणतेच भाषण कधीच लोहून काढले नाही.जसे असेल तसे समोरच्या लोकांबरोबर संवाद साधायचा हे आधीपासूनच ठरलेले.
कथाकथनाच्या दिवशी वैजापूर येथे लग्नात भेटलेल्या त्या लहान बाळाचे दादा-दादा, दादा-दादाचे स्वर माझ्या कानात गुंजत होते आणि त्या निरागस बलाचा चेहरा सारखा नजरेसमोर फिरत होता.बिडीच्या वेळी अश्रूंनी डबडबलेला चेहरा विसरणे शक्यच नव्हते.
कथाकथनासाठी  उभा राहिलो, आणि मी कथेला प्रारंभ केला........ स्वातंत्र्यापूर्वीचे गाव, ज्या गावात अस्पृश्यता अगदी टोकाची पाळली जात होती. अगदी अस्पृश्यांची सावलीसुद्धा अंगावर पडू द्यायची नाही इतकी ती पाळली जात असे. तेव्हा गावात एकत्र बसने, एकत्र जेवणे या गोष्टी फारच दूर राहिल्या. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत या अस्पृश्यांचा सहभाग नसे. असह प्रकारचे दुर्लक्षित जगणे काय कामाचे असा विचार कित्येकांच्या मनात येई. पण कधीतरी हि परिस्थिती बदलेल या आशेवर दिवस ढकलणे चालू होते. जगण्यासाठी माणूस किती टोकाला जाऊ शकतो याची अनेक उदाहरणे त्या गावात बघायला मिळत होती. चोर्या करणे हा किरकोळ विषय होता. पण एखादे जनावर मेल्यावर या क्षुद्र लोकांना बोलावले जात असे. त्या जनावराची कातडी काढण्यापासून तर मेलेल्या जनावराचे मांस खारवून (मीठ लावून ठेवणे) पर्यंत सर्व कामे हि मंडळी गरजेपोटी करत असत. जेव्हा केव्हा अन्न उपलब्ध नसेल, तेव्हा तेव्हा हे खारवलेले मांस पोटाची, मुलाबाळांची पोटाची खळगी भरण्यासाठी उपयोगात आणले जात असे कारण त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्यासमोर नसे.
आपल्या कहाणीचा नायक म्हादू. हासुद्धा या सर्वांपैकीच एक. चार वर्षांपूर्वी म्हादुच लग्न झाले. दुर्दैवाने त्याची बायको दोन वर्षातच एक तांह बाळ म्हादुच्या पदरात टाकून मरण पावली. खूप रडला म्हादू त्यावेळी. जीवापाड जपायचा तो आपल्या बायकोला.कारण लहानपणापासूनच अनाथ असल्याचे दुःख त्याने भोगले होते. प्रमानिक्पानाच्या जोरावर गावातील लोकांची मर्जी सांभाळत त्याने गावात स्वताची किंमत तयार केली होती. किंमत ती काय म्हणा, म्हादू सांगितलेल्या कामाला कधीच नाही म्हणत नाही, त्याच्या अंगी प्रामाणिकपणा आहे, बिचारा कधी चोर्या चकार्या करत नाही. हेच ते काय त्याच्या किमतीचे लेबल. अर्थात याच एका किमतीच्या लेबल्साठी गरीब माणूस आयुष्यभर झटत असतो......... बायको गेल्यावर दुसर्या लग्नाचे प्रस्ताव म्हादुकडे आले पण त्याने स्पष्ट नकार दिला. पदरात पडलेल्या बाळाचा प्राणपणाने सांभाळ करायचा असे म्हदुने ठरवले. दुर्दैव काही त्याची पाठ सोडेना. आणखी वर्षभरातच त्याच हिरमोड झाला. बाळ मतीमंद निघाले. बाळाला नीट बोलता येत नव्हते कि चालताही येत नव्हते. या बाळाची आई आणि वडील अशा दोघीही जबाबदार्या म्हादुच पार पाडत होता. आता तर ते बाळच म्हादबाच सर्व विश्व होते. त्याने आपल्या बाळाचे नाव पिऱ्या ठेवले. पिऱ्या दोनच शब्द बोलू शकत होता. बाबा- बाबा, बाबा-बाबा. तेवढ्या दोन शब्दांमध्येच पिर्याचे विश्व समावलेले होते. जसजसा पिऱ्या मोठा होत होता, तसतसा तो फक्त बाबा- बाबा चे बोल तेवढे स्पष्ट उच्चारू लागला. बाकी पिऱ्या कधी काहीच बोलला नाही. म्हादबसाठी पिर्याच्या तोंडचे तोंडचे बाबा-बाबा हे शब्द अमृताहूनही गोड होते. प्रत्येक बापाला ते असतात तसे. येथे उच्च- नीच, स्पृश्य-अस्पृश्य माणूस- जनावर असा भेद निसर्ग कधीच करत नाही. या बाबा शब्दांभोवातीच म्हादबा व पिर्याचे आयुष्य गुंफलेले होते. पिर्याच्या सर्व ओर्डर बाबा बाबा या दोन शब्दांवर भागवली जात असे. फक्त म्हादबाच त्या शब्दांचा अर्थ लावू शकत होता. पिर्याची अंघोळ, तहान-भूक सर्व काही या दोन शब्दांत म्हादबाला काळात असे. हे सर्व म्हादबा अगदी आनंदाने अविश्रांत करीत असे.
एकदा का दुर्दैवाने तुमचा पिच्छा पुरवला कि ते सहजासहजी तुम्हाला सोडत नाही. बर्याचदा आयुष्य पूर्ण उध्वस्त करून टाकते.......... त्याचवेळी गावात अस्पृश्यामध्ये चळवळीचे वारे वाहू लागले. अस्पृश्य समाजात आपण अस्पृश्य असलो तरी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. अशी कुणकुण सुरु झाली. आम्हालाही समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घ्या, वगैरे वगैरे.. अशा म्हण्या जोर धरू लागल्या. या मागणीसाठी गावातील वातावरण बिथरले. उच्च जातीचे लोक या सगळ्यासाठी तयार नव्हते. बरेच दिवस वातावरण धुमसत राहिले.कुणीच काही निर्णय घेण्याप्रात येईना. विचारांची ढकलाढकली चालूच होती. अचानक एके दिवशी अस्पृश्यांनी उठाव केला कि यापुढे आम्ही स्पृश्यांची क्न्तीही कामे करणार नाही. भुकेने मेलो तरीही बेहत्तर पण आता माघार नाही. आम्हालाही तुमच्यासारखे जगायचे आहे.... आम्हीसुद्धा माणसंच आहोत.... तुमच्या पंक्तीत बसायचे आहे....... मंदिरात प्रवेश करायचा आहे. तुमच्या पाणवठ्यावरील पाण्याची चव चाखायची आहे.... नायतर आम्ही कोणतीच कामे करणार नाही. मेलेली ढोरंही उचलणार नाही, आणि दगड ही फोडणार नाही आणि शेतात कामालाही येणार नाही. प्रश्नाने उग्र रूप धारण केले होते. कुठेतरी समन्वय घडवून आणणे गरजेचे होते. गावचे पाटील हे मायाळू वृत्तीचे होते. त्यांनी आधीच गावकर्यांना स्पृश्य अस्पृश्यता न पाळण्याबद्दल समजावले होते. पण कोणीही त्यांच्या बाजूने नसल्याने गाव करी ते राव काय करी’ त्यांचा नाईलाज झाला होता. आज मात्र सर्व गावकर्यांनी येऊन त्यांना हा जातील प्रश्न सोडवण्यासाठी साकडे घातले. प्रकरण फारच पेटले होते. गावकरी अस्पृश्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य करायस तयार नव्हते आणि अस्पृश्य सुद्धा आपल्या मागण्यांवर ठाम होते.
शेवटी पाटलांनी एका अटीवर मध्यस्ती करण्याचे मान्य करून ‘मी जो निर्णय देईल टी सर्वांनी मान्य करायला पाहिजे’ असे सांगितले. दोन्ही बाजूंना पाटलांचा आदर असल्याकारणाने होकार दिला. दोन्ही बाजूंनी पारडे तोलते ठेवणे गरजेचे होते. पाटलांनी गावात असलेल्या अस्पृश्यांपैकी प्रत्येक अस्पृश्याला वर्षातून एक दिवस उच्चवर्णीयांप्रमाणे व्यतीत करता येईल. असा निर्णय दिला. त्याला उच्च वर्णीयांच्या बैठकीत बसता येईल, त्यांच्यासारखे जीवन जगता येईल, असा निर्णय झाला. म्हणजे एक अस्पृश्य एका दिवसासाठी उच्चवर्णीय होणार. पण उच्चवर्णीयांनी एक अट टाकलीच.... अट अशी होती कि जो अस्पृश्य उच्चवर्णीय म्हणून जीवन जगेल त्याने त्या दिवशी उच्चवर्णीयांचे सर्व नियम पाळावयाचे. जसे सकाळी उठून डोक्यावरचे सर्व केस काढून सुगंधी पाण्याने अंघोळ घातली जाईल. सोवळे नेसून मंदिरा जावून त्याने देवाची यथासांग पूजा करावी नंतर सर्वांचे बरोबर पंक्तीत बसून जेवावे, त्याचबरोबर त्याने कोणत्याही अस्पृश्याला हात लावता कामा नये. नाहीतर तो बाटला जाईल. आणि गावाच्या पद्धतीनुसार त्याला सर्व उच्चवर्णीयांकडून जबर चोप दिला जाईल. वगैरे वगैरे...... सर्वानुमते हा निर्णय मान्य झाला. एकतर अपेक्षा नव्हतीच पण चला एक दिवस का होईना आपल्याला उच्चावार्नियांचे जिने जगायला मिळणार म्हणून प्रत्येक अस्पृश्य खुश होता. आपली पाळी कधी येईल, आपली वेळ आल्यावर आपण कसे वागू, काय काय करू, काय खाणार अशी स्वप्ने प्रत्येकजण रंगवत होता.
‘एकदा एका ओंडक्याला पालवी फुटली
त्यालाच कळेना जगण्याची  जिद्द कुठली.’
ठरल्याप्रमाणे गावातील एकेका अस्पृश्याचा सोडतीप्रमाणे दिवस येत होता, आणि तो अस्पृश्य उच्चवर्नियाचे जीवन जगण्याचा आनंद घेत होता. त्यांच्या पंक्तीत जेवत होता. मंदिरात जात होता उच्चवर्णीयांमध्ये मिसळत होता. त्याला कुणीही कमी लेखत नव्हते. स्वर्गसुखच म्हणा कि हे...... कारण जिवंतपणी मरणयातना भोगनार्यांसाठी हा एक दिवस स्वर्गासुखाबरोबरच होता.दिवसांमागून दिवस जात होते. प्रत्येक अस्पृश्य आपल्या दिवसाची वाट पाहत होता तसेच ज्यांचे उच्चवर्णीय म्हणून जीवन जागून झाले होते तो त्या दिवसाच्या आठवणी चघळत दिवस काढत जगात होता. इकडे म्हादबा व पिर्याचे आयुष्यही संथगतीने पुढे सरकत होते. इतरांप्रमाणे एक दिवस का होईना आपल्यालाही उच्च्वार्नियांप्रमाणे जीवन जगण्यास मिळेल या आशेने म्हादबाच्याही मनात आशेचे आकांक्षांचे धुमारे फुटत होते. त्या दिवशीचे स्वप्न रंगवत म्हद्बाचे दिवस जात होते. आणि एके दिवशी म्हादबाच्या नवे सोडत निघाली. म्हादबाला उद्या उच्चवर्णीय जीवन जगता येणार होते. तसे त्याला सांगण्यात आले.म्हादबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.
म्हद्बाने लगेच दुसर्या दिवसाची तयारी सुरु केली. डोक्यावरचे केस कापले गेले. स्वच्छ दाढी घोतली. सकाळी सकाळी म्हादबाला अत्तराच्या पाण्याने अंघोळ घातली गेली. सोवळे नेसावयास देऊन मंदिरात मंत्रोच्चाराने त्याची शुद्धी करवून घेण्यात आली. आणि त्याला मंदिरात पूजा करण्यास परवानगी देण्यात आली.आज म्हादबा खूप खुश होता.त्या खुशीत त्याला पिर्याची थोडावेळ आठवणच पडली. आज तो आनंदात नुसता गावभर फिरत होता.आजचा दिवस उच्चवर्णीय असल्याचा किती अभिमान त्याला वाटत होता.सार्वजन त्याच्याशी अदबीने बोलत होते.त्याच्याशी गप्पा मारत होते. कोणताही अपमानाचा लवलेश दिसत नव्हता. खरच स्वर्गात असल्यासारखे वाटत होते हे सर्व.........
हे सर्व करता करता दुपारच्या जेवणाची वेळ येऊन ठेपली. आता म्हादबाला सर्व उच्च्वार्नियांबरोबर पंक्तीत बसून जेवायला मिळणार होते. एऱ्हवी उष्ट्या पत्रावळीवरील अन्न गोळा करावे लागणारा म्हादबा सर्वांच्या समवेत पंक्तीत जेवायला बसला.सर्व प्रकारचे पक्वान्न म्हादबाच्या ताटात वाढले गेले. अरे वा! जिलेबी, गुलाबजाम, वरण भात, अशी कितीतरी प्रकारची व्यंजने म्हादबाच्या ताटात आज ओसंडत होती. सर्व पंक्तीला वाढल्याबरोबर प्रार्थना सुरु झाली..
वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन हों नाम घ्या तुकाचे, अन्न हे परब्रम्ह जाणिजे यज्ञ कर्म, बोला पंढरीनाथ महाराज कि जय..... बसा.
बस म्हटल्याबरोबर सर्वांनी जेवणास सुरुवात केली. म्हादबाने त्याचे आवडते व्यंजन जिलेबी उचलली, तोंडात टाकणारच इतक्यात त्याच्या कानावर आवाज आला...... बाबा-बाबा! म्हादबाच्या हातातला घास तिथेच अडकला.पिर्याची आर्त हाक म्हद्बाचे काळीज चिरत गेली. कानात गरम गरम शिसे ओतल्याप्रमाणे टी आरोळी म्हादबाच्या कानात घुमत राहिली. मंदिराच्या ओट्यावर सर्वजन जेवणावळीचा आस्वाद घेत होते. सर्व उच्चवर्णीयांची पंगत बसलेली.. आणि समोरच्या पटांगणात रणरणत्या उन्हात. गरम फोफाट्यात बसून पिऱ्या म्हादबाला आवाज देत होता. बाबा-बाबा, बाबा-बाबा, ....
म्हादबाचे संपूर्ण शरीर त्या आर्त हाकेने घामाच्या धारांनी डबडबले, आता काय करायचे, असे वाटत होते कि असेच उठून पळत जावून पिर्याला उचलून छातीशी कवटाळावे, त्याचे भराभरा पापे घ्यावे, आज आपल्याला त्याची आठवण कशी झाली नाही, आज आपण एवढे स्वार्थी व कठोर कसे झालो या विचाराने त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली.त्याला आज सकाळपासून कोणीच अंघोळ घातली नसणार कि दूधही पाजले नसणार या जाणीवेने त्याचा जीव कासावीस झाला.त्याला खूप तहान लागली असणार, तो गरम फोफाट्यात बसून फक्त बाबा-बाबा म्हणत असला तरीही म्हादबाला हे काळात होते कि माझा पिऱ्या भुकेने व्याकूळ झाला आहे. कारण त्याची भाषा फक्त म्हद्बालाच काळात होती. म्हादबा आहे त्याच स्थितीत गोठून गेला, पण आता काय करायचे हे त्याला सुचत नव्हते. आज तो उच्चवर्णीय होता व त्याचे सर्व नियम पाळणे त्याला बंधनकारक होते. आणि पिऱ्या मात्र अस्पृश्य ! आज नियमाप्रमाणे म्हादबा पिर्याला स्पर्श करू शकत नव्हता, त्याच्याबरोबर राहू शकत नव्हता कि त्याला खाऊपिऊ घालू स्जाकात नव्हता. पिर्याला स्पर्श करणे हे म्हादबाला वर्ज्य होते.नाहीतर परिणाम भयंकर होते. म्हादबाचे जेवण तिथेच थांबले, चेहरा घामाने डबडबला. समोर पिर्याचा बाबा-बाबा चा जयघोष चालूच होता. गरम फोफाटयात  पिर्याला चटकेही बसत होते. सूर्य डोक्यावर आल्याने त्याची तीव्रता वाढतच होती. तसतशी पिर्याची बाबा-बाबा बाबा-बाबा ची आरोळीही क्षणागानिक वाढत होती, सोबतच म्हद्बाची तगमग.......
म्हद्बाचे मन कासावीस झाले.मनात भावनांचा कल्लोळ उठला. नको हे उच्चवर्णीय जगणे असे त्याला वाटून गेले. पण आता पर्याय नव्हता. काय करावे हे त्याला कळेना. पंक्तीतील बाकी लोकांची जेवणे झाली.काहींना म्हादाबाची ही स्थिती कळली तर काहींनी त्या दिवशी हे अस्पृश्य फार माजले होते त्याचं सूड आज घ्यायला मिळणार म्हणून ते मनोमन आनंदीही झाले होते. ते फक्त बघ्याची भूमिका घेऊन आनंद घेत होते.म्हादबाला मात्र आजूबाजूला जे काही चालले आहे याची काहीच कल्पना नव्हती. त्याला फक्त बाबा-बाबा या हाकेचा जयघोष ऐकू येत होता. त्या आवाजाने त्याच्या मनात एक काहूर माजले होते. त्या काहुराची तीव्रता इतकी वाढली की म्हादबाने सर्व बंधने तोडून तो तडक ताटावरून उठला, ताटाजवळील पाण्याचा तांब्या उचलला व पळत जावून त्याने पिर्याला त्या गरम फोफाटयातून उचलून घेऊन पाणी पाजले.पिर्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने हवेत आपले हात उंचावून तल्या पिटायला सुरुवात केली. म्हादबानेही आनंदाच्या भारत त्याचे पटापट मुके घेत आपले प्रेम व्यक्त केले. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू जणू त्याच्याकडून झालेल्या अक्षम्य चुकांची साक्ष पिर्याला देत होते. सर्व जगाला जणू ते दिघे बाप-लेक विसरून गेले होते.
आजूबाजूच्या लोकांच्या भुवया तोपर्यंत उंचावल्या गेल्या होत्या. एका उच्चवर्णीयाने एका अस्पृश्याला स्पर्श केला होता. सर्वांनी एकाच गलका करत म्हादबाला झोडपण्यास सुरुवात केली.आजपर्यंतचा अस्पृश्यांवरील सर्व राग म्हादबा वर निघाला. त्यामुळे प्रत्येक उच्चवर्णीय त्वेषाने म्हादबाच्या अंगावर धावून गेला. हातात सापडेल त्याने म्हादबावर राग काढण्यात आला.म्हादबा रक्ताच्या थारोळ्यात पडला, तरीही त्याच्यावरील लोकांचा राग कमी होईना.आणि एकदाचा म्हादबा निपचित पडला व जागीच गतप्राण झाला. त्या भाउगर्दीत पिर्या कधीच बाजूला भिरकावला गेला होता.म्हादबा हालचाल करीत नाही हे पाहिल्यावर लोक बाजूला झाले आणि पिऱ्या बाबा-बाबा, बाबा-बाबा चा टाहो फोडत  म्हादबाकडे सरकत सरकत आला. आणि बाबा$$$$$$$$$$$ अशी मोठी आरोळी मारत पिर्याही तेथेच कोसळला......
पिंपळाचे झाड कोठेही उगवत,
कोठेही उगवत म्हणून त्याच कसाही निभावत.
कथाकथन संपले होते. सर्वांचे डोळे पाण्याने डबडबले होते. संपूर्ण हॉलमध्ये निरव शांतता पसरली होती. कोणालाही काही सुचत नव्हते, सार्वजन माझ्याकडे अनिमिष नजरेने बघत होते. मीही स्टेजवर तसाच उभा होतो. यापुढे काय झाले कुणालाच काही काळात नव्हते. पिर्याच्या बाबतीतला प्रश्न अनुत्तरीत ठेऊन मी फक्त चारोलीने हिंट दिली होती व स्टेजवरून खाली उतरू लागलो. टाळ्यांचा कडकडत झाला. तो थांबवण्यासाठी संयोजकांना दोनदा सूचना द्याव्या लागल्या. माझ्या कथाकाथानाला प्रेक्षकांनी साश्रू नयनांनी निरोप दिला. माझ्या कथाकाथानाला पहिले पारितोषिक मिळाले वेगळे सांगायला नको.
पिंपळाच्या झादाखाली बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले, आणि या पिंपळाच्या झाडणे मलाही आज माझी ओळख निर्माण करून दिली. यापेक्षा अजून काय...........

................................डॉं. आविनाश लांडगे (सांगाती) 

Friday, January 8, 2016

मोकळ आकाश ...... डॉं. अविनाश लांडगे (सांगाती)

मोकळ आकाश ...... डॉं. अविनाश लांडगे (सांगाती)

कुणा कुणाला बंधनमुक्त राहायला आवडेल असा प्रश्न जर विचारला तर माझ्या मते कुणीही ‘मला आवडणार नाही’ असे उत्तर देणार नाही. बरोबर आहे ना! त्याही पुढे जाऊन मी स्वतंत्रच आहे असे उत्तर देणारेही कमी भेटणार नाही.
काल नवीन वर्षाची सुरुवात झाली. खूप सारे शुभेच्छा संदेश आले व्हाटस ऍप वर. काही शुभेच्छा संदेश नवीन संकल्प करा या आशयाचे होते. यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणार संदेश होता देवळाली केंद्रीय विद्यालयामध्ये काम करणाऱ्या श्री. धनंजय पारकर सरांचा. पारकर सरांचा आणि माझा परिचय काही फार जुना नाही. पण जिव्हाळा मात्र तयार झाला तोही एकाच वर्षात. त्यांच्या विद्यालयात मी सिनिअर सुप्रीटेंडंट म्हणून सी.बी.एस.सी. बोर्डची परीक्षा घ्यायला गेलो होतो. म्हणून झाला हा परिचय. एकाच वर्ष झाले भेटीला, पण ती  खोलवर रुजली. ती भविष्यात अशीच बहरेल अशी आशा आहे. त्याचे कारण एकच आम्हाला दोघानाही दोघांकडूनही काहीच अपेक्षा नाहीत. तर त्या शुभेच्छा संदेशामध्ये नवीन वर्षामध्ये काय संकल्प करावा यावर ओशोंनी केलेलं भाष्य पारकर सरांनी मला पाठवले होते. अशोंच्या मते काहीच संकल्प करू नका काहीतरी संकल्प करायचा याचा अर्थ पारतंत्र्यात जायचे. कारण आपण आपल्या मनाभोवती या पद्धतीने काहीतरी कुंपणे टाकतो... आणि मग सुरु होतो त्या कुंपणा मध्ये घुसमटनारा प्रवास..... बर्याच गोष्टी कराव्याशा वाटतात. पण संकल्प केलाय ना! मग मन मारून जगणे आले. आणि एक दिवस येतो आणि तो संकल्प तुटतो. मग मनाची अगतिकता समोर येते. एवढे दिवस संकल्प टिकवून तरी काय फायदा झाला. त्यापेक्षा संकल्पच करू नका ना!  कशाला गोठवायचे  मन....... वा! संकल्पच न करण्याचा संकल्प केलाय मी या वर्षी. कमी अधिक फरकाने तुम्हा सर्वांच्या बाबतीतही हेच घास्डत असते का? बघा.... मला वाटते घडत असणार. असो..... हे झाले संकल्पाच्या बाबतीत. संकल्प म्हणजे नियम केला आपण आपल्या स्वतःसाठी..... बरोबर? म्हणजे या नियमाच्या बाहेर वागायचे नाही. पण एक्सेप्शनल केसेस मध्ये नियम मोडला तर चालतो. म्हणजे आपण स्वतःला स्वतःच्याच हाताने बांधून टाकतो. आहात न सहमत माझ्याशी...... मग आपण स्वतंत्र कसे? आज प्रत्येक माणसाने कोणत्या न कोण्या प्रकारे स्वतःला बांधून घेतलेय... हो! खर बोलतोय मी..... म्हणजे मी अमुक पक्षाचा.... म्हणजेच पक्षाची संहिता मी पाळली पाहिजे (अडकले)....... मी अमुक एक धर्माचा.... म्हणजे धर्माची संहिता पाळली पाहिजे. भले ती लादलेली का असेना. (बरोबर ना!..... अडकले पुन्हा एकदा..) बहुतेकांच्या बाबतीत तर धर्म .... जात या गोष्टी ओघाने, अनुवंशिकतेने आलेल्या असतात.आणि आपण सगळे या गोतावळ्यात जळमटाप्रमाणे संपूर्ण आयुष्य गुरफटून टाकतो. त्या जाळ्यात एकदा का अडकले कि पुन्हा सुटका नाही...... आयुष्यभर आपण, स्वीकारलेल्या संहितेच्या संकल्पनांवर विचार सुद्धा करत नाही. याचीही कारणे आहेत.... धर्मशास्रावर संशय घेणे हे सुद्धा पापच आहे. असा अजून एक प्रचलित सिद्धात.मग काय आहे तेच नियम काटेकोरपणे पाळायचे. त्या नियमांच्या बाहेर काही वर्तन झाल्यास ‘पाप’ केल्याचा अपराध मनात ठेऊन आयुष्य कुंठायचे..... असा संपूर्ण खेळ जीवनभर चालू राहतो.....
समाजात अशा अपराधी भावनेने जगणार्यांची संख्या काही कमी सापडणार नाही. म्हणून तर आत्मिक शुद्धीसाठी गंगातिरी आणि गोदातीरी इतक्या मोठ्या रांगा लागत असतील ना.... हे काही फक्त गंगा किंवा गोदावरीचे चित्र नाही. मस्जीदिमध्ये असो वा चर्च मध्ये प्रायःश्चीतापोटी मोठी रक्कम देणार्यांची संख्या काही कमी नाही.. बर एवढ करूनही आपण पापमुक्त झालोय का याची काहीच खात्री नाही..... म्हणूनच अशा साठत गेलेल्या पापांची मरते वेळी भीती वाटू लागते आणि माणसे मरताना रडू लागतात. खर तर जगण्याचे अंतिम सत्यच जर मरण हे आहे. मग ते जवळ आल्यावर आनंदोत्सव साजरा करण्याचे सोडून हे रडत का असतील? असा प्रश्न मला नेहमी पडतो.
म्हणजे बघा नां....... आपण एखाद्या प्रवासासाठी निघालो, अ पासून ब पर्यंत जायचंय, मग ब पर्यंत पोहोचल्यावर आपण आनंदोत्सव साजरा करायला हवा. किंवा आपण सुखरूप पोहोचलो, आपल्याला प्रवास अर्ध्यावर सोडवा नाही लागला याचे समाधान व्यक्त करायला हवे. बरोबर ना!.....अर्थातच आनंद  व्हायला हवा. मग अ म्हणजे जन्म, सुरुवात आणि ब म्हणजे मरण किंवा प्रवासाचा शेवट असे गृहीत धरले तर आपण हा प्रवास पूर्ण केल्याचा आनंद व्हायला हवा. बरोबर! ..... पण लोक रडत का असतील?... शोधूयात का?... मला या मागे काही कारणे दिसतात. बहुधा हा प्रवास खिलाडू वृत्तीने पूर्ण केला नसावा. त्यामुळे विजयाचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. हरण्यापेक्षा कुमार्गाने/ चुकीच्या पद्धतीने मिळवलेली विजयश्री जास्त टोचते. आणि हे सर्व कुठेतरी सद्सद्विवेकबुद्धीला पटत नाही. कारण तुम्ही बाह्य जगाशी, आपल्या माणसांशी, सभांमध्ये हे सर्व पटवून देऊ शकता किंवा त्या प्रकारचे भास तयार करू शकता कि तुम्ही  कसे बरोबर होतात किंवा आहात. पण तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीशी तुम्ही प्रतारणा नाही करू शकत....कुणीच नाही करू शकत. मग हेच शल्य आयुष्यभर वाढत जात असावे आणि मरण जवळ आल्यावर टोचत असावीत. स्वच्छ/ शुभ्र, निरभ्र, निर्भेळ विजयश्रीचा आनंद  ती सल आपल्याला आपल्याला मिळू देत नाही. आणि आपण दुःखी होतो/ कष्टी होतो / रडवेले होतो.
दुसरे एक कारण असण्याची शक्यता अशी आहे कि कदाचित लोकांच्या मोह, असूया, काही सुटत नाही.. जगामध्ये कायम, अविनाशी, pernmanent असे काहीच नाही हे माहित असून सुद्धा बर्याच गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. जे दुःखाचे कारण बनत असावे. म्हणजे बघा न, एक नवी कोरी गाडी (मोटारसायकल किंवा चारचाकी) घेतली कि साधारण वीस वर्षांनी ती कालातीत होणार आहे, असे माहित असूनही आपण ती गाडी कालातीत झाली म्हणून दुःख करणार असू तर त्याल काय म्हणावे?....
यामागचे तीसरे कारण नियम मोडले म्हणून असेल कदाचित. नियम म्हणजे धर्म, समाज, चालीरिती यांचे नियम. म्हणा. त्यामागची अपराधी भावना ..... मरणानंतर देवाला उत्तर द्यावे लागेल, याची भीती...... पण मग नियम तरी कुठे एकसारखे आहेत सर्वांचे? एका धर्मात एकद्शीच्या दिवशी मटन खाल्ले तर पाप, तर दुसर्या धर्मात त्याच दिवशी ईद नेहमी येते. एका पंथात मद्य पिणे म्हणजे अपराध, तर दुसर्या धर्मात तेच मद्य देवाला अर्पिले जाते. सामान्य माणूस मात्र या सर्व जन्जालामध्ये इतका गुरफटून जातो कि त्याच्या चेहऱ्यावरील तेज गायब होऊन अपराधांच्या गडद काळ्या डागांची संख्या मात्र वाढत जाते. आणि शेवटी रडकुंडीस येतात.
या सगळ्यापेक्षा मी निसर्गाने घडवलेली एक प्रतिकृती आहे. निसर्गाने ठरवून दिलेले नियम हेच माझे नियम आहेत असे गृहीत धरून जीवन व्यतीत केले तर! कशाला जल्मातांमध्ये अडकायचे आणि अडगळीत पडायचे. .... निसर्गाचा एकाच नियम आहे.. ओरबाडू नका बस्स. बाकी काहीच नाही.जे तुमच्या वाट्याला आहे त्यावर तुमचा हक्क आहेच आहे.... दुसर्याच्या वाट्याचे ओरबाडू नका. हा.... तो स्वेच्छेने देत असेल तर हरकत नाही. बरोबर ना...... म्हणजे पहा तुमची पूर्तता झाल्यावर दुसऱ्याला देण्यामध्ये तुम्हालाही आनंद होतोच ना. तसाच त्यालाही होईल. आनंद दोघांनाही होईल. आणि ज्या गोष्टीमुळे आनंद निर्माण होतो, तीच तर आहे पुण्याईची परिभाषा. ज्या गोष्टीमुळे दुःख निर्माण होते/ अर्थातच ओरबाडण्याच्याच्या वृत्तीने, हि आहे पापाची परिभाषा. पटतंय का तुम्हाला?.......
कोणत्याही खेळात जास्त नियम असले कि अपघात होतात. आणि कोणताही खेळाडू सर्व नियम लक्षात ठेवत, ठेवत खेळू लागला तर स्वच्छ्न्दीपणे खेळू शकत नाही.... आपण कमीत कमी नियम बनवले तर जीवन नक्कीच संगीतमय, आनंदमय होईल. आणि अपघाताची, चुकांची शक्यता राहणार नाही. सर्व नियम लक्षात ठेवण्याचीही गरज नाही.
मग आपल्या साध्यापर्यंत पोहोचल्यावर असणारा चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच द्विगुणीत करणारा असेल आणि आजूबाजूच्या लोकांनाही स्फूर्तीदायी ठरेल. कारण विरमरण हे नेहमीच स्फूर्तीदायी असते. त्याहीपेक्षा तुमच्या चेहऱ्यावरील समाधान लोकांना जगण्याची नवी उर्मी देईल आणि  तुम्ही बनाल एक ‘रोल मोडेल’ आदर्श व्यक्तिमत्त्व.

इति संपूर्णम....... निघतोय पुढच्या बिंदू च्या शोधात. (२.१.२०१६)

Wednesday, January 6, 2016

पिंपळाच्या झाडाजवळ.
                             ....... डॉ. अविनाश लांडगे (सांगाती)
पिंपळाचे झाड लिहिता लिहिता दोन प्रकरणे लिहून झाली. खरे तर ती कधी आणि कशी झाली ते कळलेच नाही. आयुष्याच्या प्रवासातही असे प्रसंग काय कमी वेळा येतात!  ठरवून ठेवलेली कामे करता करता अनपेक्षित धक्का देणारी सुखद घटना / कामे घडून जातात. बोनसच असतो तो म्हणा!  याचे सुख जास्त मिळते माणसाला. म्हणजे बघा न तुम्हालासुद्धा हा अनुभव आला असेल. लहानपणी कपड्याच्या दुकानात गेल्यावर दोन शिरत आवडले, त्यातला एक चोईचे करायची वेळ आली, हवे तर दोन्ही आहेत आणि दुकानदार म्हणतो कि एकावर एक फ्री आहे. कित्ती मज्जा. काय आनंद होतो ना. त्यावेळचा कोणाच्याही चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. असेच झालेय माझ्याही बाबतीत एर्हवी एखादे पण लिहायचे जीवावर येणारा मी आज चक्क दोन प्रकाराने संपवली, म्हनण्यापेक्षा कधी लिहून झाली कळलीच नाही. हा सुद्धा एक प्रवास आहे म्हणा. या प्रवासाची मजा तुम्हालाही येईल माझ्याबरोबर. कारण एव्हाना तुमाच्या लक्षात आलेच असेल कि हा प्रवास थोड्याफार फरकाने तुमचा पण आहे.
औरंगाबादचा वाद विवाद स्पर्धेनिमित्ताने सापडलेला बिंदू माझ्या आयुष्याला वळन देऊन गेला असे मी म्हटलो. पण याचा आणि पिंपळाच्या झाडच काय संबंध असे तुम्ही म्हणाल. खर तर औरंगाबाद मध्ये मला माझ्या एका वेगळ्या पैलूची ओळ्ख झाली. आजपर्यंत माझ्याकडे लोक निरागस आहे म्हणून आकर्षिले जातात असे समजत होतो. पण तसे नसून आपल्यात अजून एक गुण आहे हे माझ्या लक्षात आले ते औरंगाबाद ला. तो गुण म्हणजे लाकांना आपण जे काय सांगतो जो विषय पटवण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये लोकांना गुंतवून ठेवतो. मी जे काही बोललो ते लोकांनी लक्ष देऊन ऐकले.. त्यातून काहीतरी अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. आजपावेतो हि गोस्ज तुमच्याही लक्षात आली असणार कि आपण काही लोकांचे विचार भाषणे फार लक्षपूर्वक वाचतो, ऐकतो. तर कधी कधी समोरचा माणूस फार महत्वाच काहीतरी फार महत्वाच आहे असे माहित असूनही आपले त्या माणसाच्या बोलण्याकडे लक्ष नसते. काही वेळा रटाळ विषय वक्त्याच्या विशिष्ट गुणांमुळे विघायावर खिळवून ठेवतात, त्याच्या विरुद्धही घडतेच.
तर मी बोलता असताना लोक माझ्या बोलण्यावर किळून राहतात हे आतापर्यंत माझ्या लक्षातच आले नव्हते. मला उगाचच माझ्या निरागसपणावर अभिमान वाटे. जसजसा मोठा झालो तसतसा जगाचा खरा चेहरा दिसायला लागला. तुम्ही निरागस आहात म्हटल्यावर तुम्हाला फसवनार्यांची गर्दी तुमच्या भोवती जमा होते. या सर्वांना आधार मिळाला तो कथाकथन स्पर्धेने. या कथा कथन स्पर्धेमध्ये मी पिंपळाच्या झाडाची गोष सांगितली होती. खरे तर हे पिंपळाचे झ्झाद मला सापडले होते फोटोग्राफी करत असताना. त्याचे झाले असे-
राजूर मध्ये कानकाटे मंडळी तशी मालदार पार्टी. त्यांच्यापैकीच कोणाच्यातरी मुलाच्या लग्नाच्या शुटींग च्या निमित्ताने मी आणि विकास देशमुख वैजापुरला गेलो होतो. फोटोग्राफर बद्दल प्रचंड ग्ल्यामर असते हे एव्हाना माझ्या लक्षात आले होते. याची दोन तीन कारणे आहेत. एक तर क्यामेर्याबद्दल उत्सुकता असते. आपण फोटोग्राफरशी जवळीक केली तर तो आपला फोटो चांगला काढील किंवा तो गर्दीमध्ये आपल्यावर झूम करेल किंवा फोकस करेल अशी भाबडी अपेक्षा. आणि मुळातच फोटोग्राफर हा फ्रेश मूड मध्ये असणे गरजेचे असते. त्याला त्याची कामे दुखी कष्टी चेहऱ्याने किंवा वैतागलेल्या चेहऱ्याने करून चालणार नाही.कारण त्याच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभाव त्याच्या कामावर पडतो. त्याच्या चेहऱ्यावरच्या भावभावनानुसार समोरची व्यक्ती भावमुद्र देत असते. म्हणून त्याला त्याचा मूड नेहमी ताजातवाना सदाहरित ठेवावा लागतो. ठेवावा लागतो म्हणण्यापेक्षा तो राहतो याचेही एक कारण आहे. समोर एवढी ‘हिरवळ’ फिरा असताना याची काय बिशाद मोड खराब होउ देण्याची. नेहमीप्रमाणे मी आणि विकास आळीपाळीने कधी शूटिंग तर कधी फोतोग्रफी  करत होतो. विकास ‘हिरवळ’ पाहण्यात दंग होता. लग्नात हरखून जाण्यासारख्या गोष्टी असतातच की ! आपल्या सगळ्यांना अनुभव आहेच. हा अनुभव घेण्यासाठी लग्न करण्याची गरज नसते. फक्त कोणाच्यातरी जवळच्या व्यक्तीच्या लग्नाला जावे लागते. बरोबर ना! त्यातल्या त्यात करवला म्हणून गेला तर काय विचारायलाच नको.
या लग्नाच्या वेळी मी काहीसा माझ्याच कोशात होतो. चार दिवसांनी कॉलेज मध्य कथाकथन होते. मला औरंगाबादला सापडलेल्या माझ्या गुणाची ‘खरच मी लोकांना माझ्या बोलण्याच्याभोवती खिळवून ठेवू शकतो का?’ या (बिंदूची) प्रचीती  confirmary test घ्यायची होती. कॉलेज मधील कथाकथन स्पर्धेसाठी मी माझी उमेदवारी दिली होती. कॉलेज मध्ये आर्ट्स व्हर्सेस सायन्स अशी चुरस चालत असे. त्यावेळी कॉमर्स शाखा सुरु झालेली नव्हती. कथाकथनाच्या स्पर्धेदरम्यान वेगवेगळ्या न ऐकलेल्या कथा ऐकावयास मिळत म्हणून प्रचंड गर्दी असे. साधारणता गोष्ट ऐकायला लहानापासून सानांपर्यंत सर्वांनाच आवडते ना, म्हणून बाकी इतर कोणत्या स्पर्धेला असो व नसो या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभत असे. हॉल खचाखच भरलेला असे. या निमित्ताने आपली ओळख कॉलेजभर करण्याची हि एक नामी संधी असे. पण जर का कथा आपटली तर काही सांगायला नको, तुम्ह समजू शकता. .... समोरच्याने न मारताही मार कसा खाल्ला जातो याचा अनुभव प्रत्यकाच्या आयुष्यात असतोच तो आपण एक्सप्लेन नाही करू शकत.
मी लग्नाची शूटिंग करत असताना कोणती कथा सांगायची यावर विचार करत होतो. सकाळपासून एक चोठासा मुलगा साधारण २-३ वर्षाचा असेल सारखा माझ्या मागे मागे दादा-दादा करत फिरत होता. मी मध्याच त्याच्यापासून सुटका करून घेत तर कधी त्याचे मनोरंजन करत माझे काम करत होतो. तो मुलगा कोणाचा आहे/ होता हे काही मला शेवटपर्यंत कळले नाही. तो दिवसभर माझ्या मागे मागे फिरत राहिला. अगदी जेवतानाही माझ्या ताटात जेवला. त्याची दादा-दादा, दादा-दादा ची हाक सारखी माझ्या कानावर येत राहिली. बिदाई ची वेळ आली तरी तो मुलगा माझ्या मागे मागे फिरत होता. तो बाकी काहीच बोलत नव्हता. फक्त एकाच रट दादा-दादा, दादा-दादा.
बिदाई सुरु झाली. मुलगी रडू लागली, मिलीची आई, वडील, भाऊ, बहिण सर्वच रडू लागले. हा इमोशनल सीन माझ्या आयुष्यात खूप वेळा आलाय कारण बर्याच लग्नांची बिदाई मी माझ्या कॅमेर्यामध्ये कैद केलीय. हे सर्व करत असताना मी प्रत्येक बिदाईच्या वेळी मुसमुसून रडलोय. एकदा तर एका अनोळखी लग्नात माझ्या बिदाई चा सीन रेकार्ड करत असताना माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून नवर्या मुलीने हसून दिले होते. तिला हसताना पाहून माझ्याकडे बघून सर्व वर्हाडी मंडळी आणि मुला मुली कडील मंडळी हसत होती. याही बिदाई च्या वेळी माझी डोळ्यात अश्रू होते. आणि तो छोटा मुलगा जो सकाळपासून माझ्या मागे मागे फिरत होता तोही माझ्याकडे बघून रडत होता. ते ओअहून मला आणखीच रडू आले. कारण खर्या अर्थाने आमच्या बिदाईची वेळ झाली होती. तो परत कधी भेटेल कि नाही हेसुद्धा माहित नव्हते. शेवटपर्यंत तो मुलगा कोणाचा त्याचे आई वडील कोण हे मला काही समजू शकले नाही. आणि तो गायब झाला. बहुदा बिदाई नंतर ब्याग भरण्याच्या गडबडीत त्याचे आईवडील त्याला घेऊन गेले असावेत.

मला कथा सापडली होती. कधीतरी इंग्रज राजवटीत अस्पृश्य लोकांवर होणार्या अत्याचारांबद्दल मी वाचले ऐकले होते. असाच एक अस्पृश्य बाप आणि त्याचा मतीमंद मुलगा ज्याला फक्त बाबा बाबा म्हणता येते, यांच्याभोवती हि कथा गुंफायची असे मी मनोमन ठरवले आणि पुढील लग्नाच्या शूटिंग साठी भटक्या जमातीच्या जगण्याच अनुभव घेत आलेफाटा बारा बंगला येथे निघालो. नवीन बिंदूच्या शोधात......... 

पिंपळाच्या झाडाकडे जाताना .....

पिंपळाच्या झाडाकडे जाताना .....
लेखनाची एक वेगळीच मजा आहे. आपण जर का ठरवले आज लिहुयात तर नाहीच सुचत काही. खूप वेळा खूप घाईच्या वेळी, निवांत क्षणी काही बाही सुचून जाते जे खरच लिहावेसे वाटते .... नेहमीप्रमाणे आळस करत लिहू कधीतरी असे म्हणून तो विषय बाजूला पडतो आणि ... बाजूलाच पडतो. असे कित्येक विषय आतापर्यंत सुचलेत आणि बाजूला पडून गेलेत. त्यामागेही एक कारणमीमांसा आहे म्हणा.... म्हणजे प्रत्येक गोष किती प्रोडक्टीव आहे... ती गोष केल्याने नफा किती वगैरे ने सुरुवात होते आणि मग सुचलेले विचार आल्या पावली परत फिरतात. बघू कधीतरी नंतर असा विचार करून आतल्या आत कुढत बसतात. बाहेर पडायचे असते त्यांना पण .....
खरे तर एवढे सगळे लिहून कोणी वाचेल का? किंवा वाचलेच तर त्याचा किती उपयोग होईल असे प्रश्न असतात मनात. दरम्यानच्या काळात आपण स्वताच्याही कोशात अडकत जातो, हेही तितकेच खरे. तर लिहण्यासाठी एक फ्लो हवासतो असे म्हणतात. विचार करून ठरवून कधीच लिहिता येत नाही.  अगदी खरंय हे ....
एफ. वाय. बि. एस्सी. ला Admission घेतले गेले होते. वसतिगृह आणि जेवण च्यकाटफू असल्याने खर्चचा काही विषयच नव्हता. खर्च तो काय महिन्याभरासाठी  एक साबण खोबरेल तेलाची एक बाटली टूथपेस्ट आणि टूथब्रश. चहा पिनासाठी पैसे लागत पण college ला त्यावेळी canteen नव्हते व गावापासून college ४ कि.मी. लांब असल्याने फक्त चहा पिण्यासाठी ४ कि. मी. पायी जाणे परवडणारे नव्हते. कारण सायकल कोणाकडेच नव्हती. तशी कधीतरी सकाळी (बहुदा रविवारी) आमची टी partyअसायची. आमच्यापैकी बहुतेक जन पुणे विद्यापीठ पुरस्कृत कामाव व शिका योजनेत काम करत असू. त्या काम करणाऱ्यामध्ये मीही एक होतो. महाविद्यालयाच्या परिसरातील गावात कापण्याचे काम आम्ही करत असू. १० रु. तास प्रमाणे आम्हाला पैसे मिळत असत. रोजचे दोन तास काम म्हणजे २० रु मिळत ...अशा प्रकारे महिन्याचे कमी अधिक ६०० रु मिळत असत. त्यामानाने आम्ही खूप श्रीमंत होतो. बरोबर ना! ... ना खानावळीचा खर्च, ना वसतिगृहाची फी, कसलाच खर्च नाही. चक्क पैसे शिल्लक पडत! म्हणून मग रविवारी चहा partyपार्टी करत असू. अगदी दहा मित्र घेऊन गेलो तरी बिल १५ रु. झाली partyपार्टी...... अर्थातच पार्टीचा टर्न दोन महिन्यातून एकदा यायचा. म्हणजे दोन महिन्यातून १२०० रु पैकी १५ रु पार्टीसाठी बाकी किरकोळ खर्च (बुरुडशेठची जिलेबी) महिना ५०० रु मागे पडत. बचत करत होतो आम्ही! दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेतून झालेली जादान्घादानाही खूप कामी आली. पैशामुळे शिक्षण कधीच थांबत नाही.... फक्त शिकण्याची जिद्द असली पाहिजे याच प्रत्यय पदोपदी येत होता. राष्ट्रीय सेवा योजनेतील अनुभवांबद्दल नन्तर लिहील कधीतरी. असाही तो एक स्वतंत्र प्रकरणाचा विषय आहे. ... वसतिगृहात जाऊन बरेच दिवस झाले होते. आतापावेतो आमची मैत्रीही चांगली बहरली होती. सुरुवातीला वसतिगृहात राहत असताना मी बराच बुजरा होतो. घाईघाई कोणाबरोबर बोलणे मला जमले नाही. पण निसर्गातच गोंडस रूप मिळाल्यामुळे माझ्याबद्दल बहुतेकांना स्नेह वाटे. त्यामुळेच वसतिगृहात सगळ्यात जास्त माझे मित्र बनले. बसतीगृहात स्वयंपाक करण्यासाठी दोन बायका होत्या त्यांना आम्ही मावशी म्हणत असे. त्यांना पण मी खूप जवळचा वाटे. शक्यतो संपूर्ण स्वयंपाक झाल्याशिवाय कोणाल जेवायला मिळत नसे पण मला तो मान कधी कधी मिळत असे. किती गम्मत बघा या सर्व विद्यार्थ्यामध्ये मला वेगळी treattment मिळायची तरी किती भारी वाटायचे ..... आपण उगाचच खूप श्रीमंत असल्यासारखे वाटायचे. खरच होते कि ते! त्या स्वयंपाक करणाऱ्या मावश्यांच्या प्रेमाची श्रीमंती होती माझाकडे जी अजून कोणाकडेच नव्हती. मग मी श्रीमंतच ना ..... होस्टेलचे रेक्टर/ मेस म्यनेजर/ स्वीपर/ शिपाई अशी सर्व कामे करणारे श्री लान्घी. नेहमीच उपकृत असत माझ्यावर. एकूण काय त्याही परिस्थितीत स्थावर होण्यामागे या सर्व लोकांचे खूप सहकार्य लाभले. कारण मी स्थावर होईस्तोवर बरेच विदयार्थी पळून गेले होते.
F.Y.B.Sc. पास झालो. कमवा व शिका चे कामं चालूच होते. संध्याकाळी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणे हा आमचा आवडता छंद. अशा अनेक विसायांवर आम्ही वाद घातलेत. अर्थातच हे वैचारिक मतभेद असत. पण चुरस मोठी असे. त्यासाठी लागणारे मुद्दे, पुरवणी मुद्दे हे अगदी इन्स्टट असत. कारण वादाचे विषय ठरलेले नसत. ते अचानक प्रकट होत. त्यामुळे वाद घालणे आणि वाद विवाद ऐकणे यात एक वेगळीच मजा असे. संपूर्ण वसतिगृहाचे दोन भाग पडत. एक ग्रुप च्या बाजूने आणि दुसरा विरुद्ध बाजुने. असो त्यामुळे खूप ज्ञान वृद्धीही झाली हे वेगळे सांगायला नको. आपले मुद्दे पटवून देण्याचे वेगळे कला या माध्यमातून मिळाली. वादविवादात अग्रभागी असलेले सतीश चोपडे, विलास भालेराव, गणेश बारगजे, मोहन कडाळी, बाबा थोरात आणि मध्येच कॉमेडी करणारे संतोष काळे, एन. जी. नेहमी सिरिअस मूड मध्ये असणारा मनोज वदक यांना विसरणे शक्यच नाही. वसतिगृहामध्ये टीव्ही नसणे किती हितकारक असू शकते याच वस्तुपाठच मला येथे मिळाला. करमणुकीचे काहीच साधन नसल्याने असे उद्योग आम्ही करत असू. एखाद्या संध्याकाळी संगीतरजनीही जमे. सामान ठेवण्याच्या पेट्यांचे ट्रिपल बनत कुलुपाच्या किल्ल्यांची घुंगरू आणि सुरु होई गायनाची मेजवानी. आवाज कसा का असेना मनापासून गाणे म्हटल्यास ए सामोरच्या हृदयापर्यंत पोहोचते, हे हि येथेच शिकलो. बाबा थोरात चे ‘चलते - चलते मेरे ये गीत याद रखना’ आजही जसेच्या तसे लक्षात आहे. गणेश बारगजे ‘कही दूर जाब दिन ढल जाये’...... काय म्हणायचा म्हणून सांगू. डोळ्यातून पाणीच यायचे. त्यांची आणि आमच्याही! .. आणि विलास भालेराव चे ते ‘ओ हरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौनसे जल में कोई जाने ना....... जसेच्या तसे लक्षात आहे. किशोर कुमारची ओळखच मुळी मला या मंडळीनी करून दिली आणि किशोर कुमार माझे लाईफ लॉंग फेवरेट गायक बनले.
कॉलेज सकाळी असल्याने दुपार रिकामी मिळायची. दोन तास काम करूनही वेळ मिळत होता. या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे असे नेहमी वाटे. तीव्र इच्छाशक्ती तुमच्या इच्छा पूर्ण करते... इच्छा असली कि मार्ग निघतो म्हणतात. याचा प्रत्यय मला कित्येकदा आलाय. एकदा तर मी प्रयोग करून पाहिलंय. शिर्डी दर्शनाला जायचे ठरवले. निघालो घरून. खिशात बिलकुल पैसे नाही. मोटारसायकल वाल्यांकडून लिफ्ट घेत घेत पोहोचलो शिर्डी ला आणि तसाच परतलोही. कुठेही पैसे लागले नाहीत. शिर्डी ला भोजनालयात कुणीतरी पंगत दिली असल्याने तेथेही जेवणासाठी पैसे लागले नाहीत.
हा तर माझा मित्र संदीप आरोटे एका कॉम्पुटर क्लास मध्ये शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी जात असे. श्री. पराड सरांचे ते क्लास. एके दिवशी संध्याकाळी संदिप्बार्बर गप्पा मारताना मलाही काहीतरी नवीन शिकायचे आहे असा विषय निघाला. संदीप काम करत होताच. तुझ्यासारखे मलाही काहीतरी काम शोधून काढ असे संदीप ला सुचवले. मित्राने एखादे काम सांगितले आणि संदीप शांत बसेल असे शक्य नसे. दुसर्याच दिवशी त्याने काम शोधून काढले. काम करण्याची इच्छा आणि धमक हवी कामाला तोटा नाही. पण ज्याला काम करायचे नसते त्याच्याकडेही कारणांची कमी नसते, संदीपची हि वाक्य मी आयुष्यभरासाठी लक्षात ठेवलीत अगदी जशीच्या तशी. संदीप ने माझ्यासाठी शोधलेले काम एका फोटो स्टुडीओ मधील होते. कलामंदिर फोटो स्टुडीओ. प्रो.प्रा. आन्ना सावंत. स्टुडीओ मध्ये साफसफाई करणे, पाणी भरून ठेवणे, कॅमेरा ची स्वचाता ठेवणे बिलाप्रमाणे फोटो काढून देणे. हिशोब ठेवणे अशी कामे सुरुवातीला करत असे. नंतर आन्ना  मधील शेठ कधी गळून गेला व तो कधी मित्र बनला हे आम्हाला दोघांनाही समजले नाही, शेठ आणि नोकर असे नाते कधीच संपले होते. त्याने मला फोटो काढायला शिकवले. सर्व कॅमेर्यांची माहिती करून दिली. फोटो डेव्हेल्पिंग करणे शिकवले. आणि विदेओ शूटिंग सुद्धा. एक वर्षात मी अगदी सराईत फोटोग्राफर बनलो तेही अन्ना सावंत च्या मार्गदर्शनाखाली. कारण अन्ना सावंत हा राजूर अकोले संगमनेर भागातील खूप नावाजलेला फोटोग्राफर होता. चेहऱ्यांचे अंगल लाईट रेफ्लेक्टीओन चे अप्रतिम ज्ञान आन्नाकडे होते. ते सर्व ज्ञान माझ्या विनयशील स्वभावामुळे आण्णाने मला दिले. अगदी कुठलाही हाताचा राखून न ठेवता. खरच आण ग्रेटच आहे. वरतून त्याची गाडी बजाज एम ८० आणि नंतर सी टी १०० वापरायला मिळायची ते वेगळेच.
एस वाय बी एस्सी ला असताना सुहास आनदगावकर राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेसाठी जाण्याच योग आला. आमच्या कॉलेजमधील शेलद या गावाचा एकनाथ यादव नावाचा एक नावाजलेला वादविवाद पटू बरोबर तिकडे जाणे झाले. हे महाशय खूप पोहोचलेले होते. खूप सार्या सामाजिक कामांमध्ये यांचा हिरीरीने सहभाग असे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर यांचे सलोख्याचे संबंध होते. एकदा तर यांनी कोलेज मध्ये स्ट्राईक घडवून आणली होती. किती रडले होते आमचे प्राचार्य टी एन कानवडे सर. विषय कितीही साधा असला तरी त्याला वेगळे रूप देण्याची व तो रंगवण्याची हातोटी या महाशयांकडे होती.  त्यांच्याबरोबर मी या वादविवाद स्पर्धेसाठी गेलो आणि अजून एक बिंदू जोडला. आजपर्यंत बरोबर आणि चूक अशा दोनच गोष्टी असतात असे माझे प्रामाणिक मत होते. आणि त्याप्रमाणे मी वागतही होतो. बरोबर म्हणजे ज्याला समाज चांगले म्हणतो असे आणि चूक म्हणजे समाज ज्याला वाईट म्हणतो असे, पण या वादविवाद स्पर्धेपासून चांगले वाईट किंवा चूक बरोबर असे काही नसतेच ते तुमच्या ग्रहण शक्तीवर अवलंबून असते याच मला प्रत्यय येथे आला. आपला चुकीचा विषय कसा रेटता येतो याची झलक मला येथे पहावयास मिळाली. आणि मला भेटला नवीन बिंदू. .....

पिंपळाच्या झाडा आधी ......

ipMpLacyaa JaaDaAaQaI………
Aaja KMr tr vaDaca JaaD ilahayacMa haotM pNa to kQaItrI naMtr ilaihla.imaLola tumhalaa vaacaayalaa.%yaat tumhI na@kI gaurfTnaar ho na@kI‚ pNa %yaalaa vaoL Aaho. Krtr vaoL Aaho mhNaNyaapoxaa %yaacaI vaoL Ajauna yaayacaI Aaho.Ajauna malaaca vaDacaM JaaD purt kLla naahI‚ maI samajauna Gaotaoya.
hao tr ho ipMpLacao JaaD…………… yaacaI ek maaozI gaMmat Aaho.Aqaa-t ho maaJao idvasa %yaa idvasaaMtIla hI gaaoYT.
rajaUr  –  ek gaava
ipMpLacyaa gad- panaaMt vaa yaacaI maMd JauLuk iSaravaI na\ panaaMcyaa saLsaL Aavaajaanao vaatavar  Ba$na jaavao AsaMca kahIsa maaJa Jaala. AayauYyaatIla ek inaNa-ya jaIvanaalaa vaogaLI klaaTNaI do}na gaolaa. %yaacao Jaalao hI Asaoca………………………p`%yaokalaa ha AnauBava na@kIca Asaola kI pihlyaa baaLabaabat Aa[- baabaa Kup protective Asatat tsacao kahIsao maaJyaa baabatIt Jaalao. [tko kI baaravaI pya-t maI maaJaa talauka AaoMlaDlaolaa navhta‚ kI kaoNaacyaa GarI saaQaa ek idvasa mau@kama kolaa navhta. Aqaa-t yaa saazI doKIla kahI vaogaLI karNao AsatIla pNa %yaa ivaYayaa var baaolaU naMtr.
 baaravaIlaa pDlaolao maa@sa- ho Jaalao rajaurlaa A^DimaSana GaoNyaasaaZI. baaravaIcyaa pUva-prIxao pya-MMt caaMgalao gauNa imaLvaNaara maI baaoDa-cyaa prIxaot maI sapSaola AapTlaao %yaa maagacao mau#ya karNa haoto maaJaa Aa%maivaSvaasa. KMrtr maI prIxaa naapasa haoNaar mhNaunaca idlaI haotI  pNa kaya cama%kar Jaalaa kaoNa jaaNao naI maI 47 T@ko Gao}na ]%tI-Na Jaalaao. maga kaya iDp`oSana maQyao haotaoca.pNa maaJaa AnauBava Asaa Aaho kI jaovha maI iDp`oSana Asatao tovha maI caTkna inaNa-ya Gaotao.%yaap`maaNao maI inaNa-ya Gaotlaa kI vaiDlaaopaija-t SaotI krayacaI. vaiDMlaaMnaI SaotIt DaiLMba laavalaolao haotoca %yaacaI yaaogya p`karo CaTNaI k$na SaoNaKtacao iZga k$na Jaalao haoto. baaravaIcaa inakala laagalaa 47 T@ko.....vaiDlaaMnaa saaMigatlao maI ITI krtao. kuzotrI naaokrI imaLola. vaiDla AiSaxaIt trI ITI Sabd ]ccaarlyaavar %yaaMnaI nakar idlaa.kMpnaItlyaa naaokrI ba_la %yaaMnaI kahI eoklaolao Asaola. maga maI mhTlao‚ evaZyaa maaka-var malaa kuzohI A^DimaSana imaLnaar naahI maI SaotI krtao. vaiDla gaalaatlyaa gaalaat hsalao mhNaala,o izk Aaho. Kupda maaJao vaiDla Asao gaalaatlyaa gaalaat hsalao kI malaa ek kaoD pDtM. to Asao hsatat jasao maaJao sava- BaivaYya %yaaMnaa maaiht Aaho आणि ते मनातल्यामनात म्हणतात "baoTa tU jao zrvat Aaho to tuJyaa AayauYyaat naahIca mauLI pNa izk Aaho yaaogya vaoL yao} do tulaa samajaola AapaoAap". ASaa p`karo vaiDlaaMcyaa maaga-dSa-naa KalaI SaotIcyaa kamaalaa saurvaat JaalaI.pazIvar pMp Gao}na 600 JaaMDanaa fvaara मारत Asao. saurvaatI pasaunaca maI kahI QaYTpuYT navhtao pNa kYT krNyaa[tpt SarIr kmaavalaolao haoto.yaa AaQaI evaZo kama kolao nasalyaanao qakUna jaat Asao vaiDlaaMnaa to pahvat navhto pNa yaatuna %yaaMnaa, मला kahItrI iSakvaayacao Asaavao malaa mhNaUna to kahIca baaolat navhto.sava- ima~aaMbaraobar saMpk- tuTlaa haota. manaatlyaa manaat tDfD hI caalau JaalaI haotI kI bahuda yaa caar ekratca Aaplao AayauYya saMpNaar. %yaamaagao tSaI karNao hI tyaar JaalaI haotI. maI maSaagat kolaolyaa baagaolaa pa}sa pDunahI fula³bahr´ yaot navhta. maI AgadI hlavaaidla Jaalaao. Aro baaproÑ Aata kaya krayaMca‚ pUNa- isaJana fukT jaaNaar maga ]%pnnaacaa s~aaot kayaÆ majaUrI krayacaI…………… AaiNa raojacaa Kca- ksaa BaagaNaarÆ AvaGaDca haoNaar sagaL……………Aaja vat-maana p~aaMmaQyao ‘SaotkrI Aa%mah%yao ivaYayaI’ eoklao kI (dya AgadI ipLvaTUna jaato.karna maI ho sava- javaLUna AnauBavalao AgadI AatDyaalaa gaaz basao pya-t maI hI SaotIt rabalaaoya………prt bao cao paZo pMccaavana sau$ k$na panagaL k$na prt bahr yaoNyaacaa p`ya%na krt haotao. taovar 15Aa^gasT 2002 ]jaaDlao haoto. ek maa~a Kro kI Aa^gasT mihnaa maaJyaa AayauYyaat naohmaI kahI trI navaI saurvaat Gao}na yaotao mhNaUna Aa^gasT mhNajao saurvaat ha Aqa- maaJyaa AayauYyaaSaI yaqaaqa- jauLtao. JaaMDanaa fulao yaavaIt yaasaazI %yaavaoLI kahI enzyme %yaavaoLI baajaarat AalaI haotI. %yaacaI fvaarNaI JaaMDavar krNyaat maI gak- Jaalaao haotao AQao- Saot fvaa$Na Jaalao haoto tovaZyaat baaLU ³maaJao QaakTo baMQaU jyaaMnaa maI vasaMtrava mhNatao´ saayaklavar Qaapa Takt maaJyaakDo Aalaa AaiNa saaMgaU laagalaa kI tulaa BaoTayalaa kuNaI sar Aalaot tulaa GarI baaolaavalao Aaho. GarapasaUna DaiLMba Asalaolaa maLa 4ik.maI AMtravar haota. prt jaa}na yaayacao mhNajao idvasaBaracao kama baaoMbalanaar. trI tsaaca gaolaao GarI kuNaI sar malaa BaoTayalaa yaoNao Apoixat navhto pNa Aata Aalao tr BaoTayalaa paihjao, mhNaUna GarI Aalaao.
       rajaur mahaivadyaalayaatIla p`a.laxmaNa vaaLo va p`a. saMjaya kDlaga maaJyaa GarI basalaolao haoto taopya-Mt Aa[-nao %yaaMcyaa jaovanaacaI saaoya kolaI haotI AaiNa %yaaMnaa jaovaU Gaatlao haoto.AjaunahI vaaLo sar AazvaNa kaZtat "pihlyaa idvaSaI tuJyaa GarI vaalaacyaa SaoMgaacaI BaajaI KallaI haotI kaya mast BaajaI JaalaI haotI".maI GarI paohcalyaavar saraMnaa namaskar kolaa. Aqaa-t to maaJyaasaazI AnaaoLKI AsaunahI AaoLKIcao vaaTt haoto.%yaaMnaI malaa 12vaI laa pDlaolao maask- ivacaarlao. maI KrI pirisqatI saaMgatlaI. ‘puZo kaya krayacaoÆ’ kDlaga saraMnaI ivacaarlao. maI jasao zrvalao haoto tsao ‘SaotI krNaar’ Asao ]%tr idlao. %yaaMnaI malaa saaMigatlao kI tU rajaUr mahaivadyaalayaat p`vaoSa Gao va B.Sc cao iSaxaNa pUNa- kr. maI ‘baGatao’ mhNaalaao Aqaa-t maI jaa[-la ASaI Sa@yata navhtIca karNa Aata zrvalayaM SaotI krayacaI tr kSaalaa faTo faoDayacao Asaa ivacaar k$na %yaaMnaa kTvaNyaacaa p`ya%na krt haotao.vaaLo saraMnaI ho horlao AaiNa %yaaMnaI AaNNaaMnaa ivacaarlao tUmhalaa kaya vaaTto‚ maulaacao iSaxaNa pUNa- haot Asaola tr malaa AanaMdca Aaho. vaiDlaaMnaI haokar idlaa. maga tumhIca AivanaaSalaa samajaavaUna saaMgaa. saraMnaI direct middle stuump var baa^la Taklaa. AaiNa sar inaGaUna gaolao. jaatanaa ka^laoja tr baGaayalaa yao evaZo saaMgauna gaolao. maI hao mhTlao.
       sar gaolyaavar AaNNaaMnaI malaa ivacaarlao kaya krayacao? maI Aata SaotI krayacaa inaNa-ya Gaotlaaya naa maga malaa toca k$ dyaa, Asao mhTlao AsaohI 47T@ko mhNajao maI kaya far kahI iSaxaNa xao~aat krIla Asao malaa naahI vaaTt.punha toca %yaaMcao imaSkIla hasya……………%yaaMnaI malaa samajaavalao‚ ho baGa maaJao sava- AayaUYya SaotIt caalalaya AaiNa jaa[-la yaat kahI SaMka naahI शेtI krNao ha ek p`karcaa jaugaar Aaho.kaoNatIhI SaaSvatI naahI.inasa-gaacyaa lahrIpaNaatUna jarI tUmhI vaacalao trI baajaarBaavaacyaa igarNaItUna sahI salaamat vaacaala yaacaI SaaSvatI naahI.rahIlaa p`Sna SaotIcaa tr SaotI krNyaasaazI maI AjaUna QaDQaakT Aaho tU SaotIcaI kaLjaI krNyaa[tkI garja AjaUna trI AalaolaI naahI. SaotI maI ekTa saMBaaLU Saktao. SaotIt kYT  krNyaa[tkI tuJaI SarIryaYTIhI naahI. SaotIt kama krayacao mhNajao ravaNaacao baL paihjao ho sava- tU maagaIla caar maihnyaat AnauBavalao Aahoca maIhI mau_amahUna caar mihnao SaotIkDo dUla-xa kolao haoto karNa %yaaiSavaaya SaotI kaya Aaho ho tUlaa kLNaar naahI. tovha maaJao eok maI tUlaa caar vaYao- majaa krNyaasaazI mhNauna rajaUrlaa pazvat Aaho Asao samaja AaiNa rajaUr mahaivadyaalayaat p`vaoSa Gao.
maI pUnha maaJyaacyaanao Aata AByaasa haoNaar naahI ]gaaca tIna vaYao- vaayaa jaatIla %yaapoxaa tIna वर्षात SaotImaQyao trI pUNa- p`aivaNya imaLvaola caa hoka laavaUna Qarlaa.
      zIk Aaho Asa jarI samajalao trI SaotI tIna vaYaa-MnaIhI [qao tSaIca rahNaar Aaho kuzohI pLUna jaaNaar naahI.saQyaa tUJao majaa krNyaacao idvasa Aaho. maI tUlaa fantoosh mhNaUna- jaao tU naahIsa AaiNa haoNaar naahI yaacaI malaa pUNa- Ka~aI Aaho - mhNaUna rajaUrlaa pazvat Aaho. jaa AaiNa majaa kr naivana jaga baGa, %yaacao kayado samajaavaUna Gao, vyavahar &ana imaLva, AaiNa pUnha maagao kQaIca maagao vaLUna baGaU nakaosa.


maaJaI 10vaI caI prIxaa Jaalyaavar 11vaI laa A^DimaSana GaoNyaasaazI jaatanaa mausamausa rDNaaro AaNNaa hoca ka Asaa p`Sna malaa pDlaa haota.10–12 vaI pya-Mt %yaaMcyaaiSavaaya kuzohI na jaaNaara maI pNa…… Aaja maa~a sagaL vaogaL GaDt haotM Aaja to malaa saaMgat haoto kI tuJaI sava- jabaabaarI tUca tuJyaa KaMdyaavar Gao AaiNa tohI maulagaa mhNaUna naahI tr Aaplaa CaoTa Baa} AsalyaasaarKo‚ ima~a AsalyaasaarKo samajaavat haoto. AaiNa maI id.16 Aa^gasT 2002 laa ekTa rajaUrlaa inaGaalaao iKSaat $. 30Gao}na‚ 10$ jaayalaa, 10$ yaayalaa AaiNa 10$.A^DimaSanalaa…………………………