एक मराठा लाख मराठा
कोपर्डी, अहमदनगर घटनेपासून समाजमनातील वळवळीचे रुपांतर चळवळीत कधी झाले
कोणालाच कळले नाही. खरे कारण पाहता हि खदखद फार कधीपासून लोकांच्या मनात होती, ती उफाळूण
येण्यास कोपर्डी घटना हे एक तात्कालिक कारण झाले, हे जरी खरे असले तरी न भूतो न
भविष्यती असा प्रतिसाद या मुकमोर्च्यांना
लाभत आहे. जरी कोपर्डी प्रकरणाचा मुखवटा घेऊन निघालेला हा शांती मोर्चा
असला तरी त्यामागे अनेक असंतोष घेऊन निघालेलाल हा समुदाय आहे. बळीराजाची झालेली
अवहेलना हे त्यामागचे एक मोठे कारण आहे. सततचे दुष्काळ आणि नापिकीमुळे बेजार
झालेला शेतकरी वर्ग शासनावर प्रचंड नाराज आहे. शेतीमालाचे उतरलेले भाव, मिळणाऱ्या
अपुर्या सुविधा यामुळे शेतकरी बांधवामध्ये असंतोष खदखदत होताच. जगाच्या पाठीवर असा
कोणता व्यवसाय आहे ज्यामध्ये भांडवलदार किंवा मालक स्वताच्या खिशातून पैसे टाकून
माल विकतो. मात्र केविलवाण्या बळीराजाची परिस्थिती वाईट झाली आहे. या असंतोषला वाट
मिळाली आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी माता भगिनींनी या मोर्च्यामध्ये सहभाग
नोंदवला. त्यांचीच उपस्थिती लक्षणीय आहे. या माध्यमातून तरी न्याय मिळेल, काही
परिवर्तन घडेल अशी भाबडी अशा या मंडळींमध्ये आहे.
अत्यंत सनदशीर मार्गाने निघालेल्या या मोर्च्याचा अर्थ व परिणाम बरेच
बुद्धिवादी लोक काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र विषयाचा आवाका इतका मोठा आहे कि
त्यातून कोणत्याच निष्कर्षापर्यंत कुणीच पोहोचू शकलेले नाही. अँञिसिटी रद्द करा
किंवा दुरुस्त्या करा हा एवढाच अजेंडा या मोर्च्याच्या मागे नक्कीच नाहीये.
या मोर्च्याच्या गुण दोषांकडे पहिले असता पुढील बाबींचा विचार करता येईल.
या मोर्च्याची वैशिष्टे (गुण):
१.
फक्त एकमेकांच्या हाकेला ओ दिल्याप्रमाणे एकत्र आलेला हा आपला समाज खरच
अभिनंदनाचा विषय आहे. कित्येक वर्ष खितपत पडलेला समाज चांगल्या मुद्द्यांवर पुन्हा
एक होऊ पाहतोय.
२.
१८५७ नंतरचा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदलासाठी समाज एकत्र
येताना दिसतोय.
३.
सनदशीर मार्गाने मुकमोर्च्या हे वैशिष्ट्ये. कोणतीही घोषणा नाही, भित्तीपत्रक
नाही, कोणत्याही पुढार्याचे नाव नाही, तरीही मोर्च्याचे शिस्तबद्ध नियोजन हा
सुसंस्कृत मनाचा अविष्कार पहावयास मिळत आहे. भारतीय समाजमनावर हा एक संस्कार
रुजवताना दिसतोय. या मोर्च्याचे म्हणूनच सर्व स्तरातून स्वागत होताना दिसतेय.
४.
केवळ मराठा हि जात नाही तर शेतकरी बांधव समाजातील सर्व जाती जमातीचे लोक
यामध्ये उपस्थिती दाखवत आहेत.
५.
समाजातील सर्व समाजबांधवांनी या पद्धतीच्या मोर्च्याचे स्वागत केले. कोणत्याही
मालमत्तेचे नुकसान नाही तसेच कोणाला कसलाही त्रास होणार याची विशेष काळजी घेतलेली
दिसतेय. सर्व जाती धर्माचे तरुण बांधव या मोर्च्यामध्ये उत्स्पूर्तपणे स्वयंसेवक
म्हणून मदत करताना दिसत आहेत.
६.
कोणत्याही गोष्टीची लालूच नाही अगदी घरातून शिदोरी बांधून माता भगिनींची
मोर्च्यास उपस्थिती दिसत आहे.
वरील सर्व कारणांमुळे मूक मोर्च्या यशस्वी होताना दिसत असला
तरी यातील काही त्रुटी प्रामुख्याने मांडाव्या वाटतात.
त्रुटी:
१.
मराठा क्रांती मोर्चाला कोणतीही विशिष्ट दिशा नाही. नक्की काय हवय याबद्दल
संदिग्धता आहे, त्यामुळे फक्त शक्तीप्रदर्शन एवढेच यामधून सध्या होताना दिसत आहे.
२.
एकूणच आतापर्यंत झालेल्या विश्वासघातामुळे मराठा समाज कोणत्याही एका नेत्याला
या क्रांतीमोर्च्याचा मुखवटा किंवा नेतृत्व देण्यास तयार नाही. आजपर्यंत सत्ता
भोगलेल्या नेत्यांनीही शेतकऱ्यांच्या (मराठा समाजाच्या) तोंडाला कशी पानेच पुसली
आहेत याची उजळणी मोर्च्याचा प्रचार करताना दिसत आहे. तरीही हाच सर्वात मोठा दोष
म्हणावा लागेल.
३.
भरभक्कम नेतृत्व नसल्याने हा क्रांतीमोर्च्या हवेतच विरून तर जाणार नाही ना याची
भीती वाटते. १८५७ साली झालेल्या उठावाप्रमाणे मराठ्यांनी एकजूट दाखवली खरी पण
त्याप्रमाणेच दिशाहीन गर्दी आणि नेतृत्वाचा अभाव यामुळे या मोर्च्याचे पुढे काय हा
खरा प्रश्न आहे. “वेडात मराठे वीर दौडले सात” हे खरे असले तरी त्यांच्याकडे एक विशिष्ट उद्धेश होता, आज खरा अजेंडा काय
याबद्दल संदिग्धता आहे. या सर्व गर्दीचा चेहरा कोण, नक्की कोणाशी चर्चा करायची? हा
मोठा प्रश्न आहे.
असो, मराठ्यांनी
(माझ्या समाजबांधवांनी) दाखवलेली हि अभूतपूर्व एकी नक्कीच काहीतरी आशादायी
चित्र उभे करून जाईल यात शंका नाही. विख्रलेला समज पुन्हा एकत्र आलाय हे फार मोठे
निष्पन्न म्हणता येईल
सामाजिक प्रसारमाध्यमानी समाजात आलेली जागरुकता खरच
वाखाणण्याजोगी आहे. हि समाजमनाची मशागत सतत चालू राहो.
साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा मराठा एकत्र आलाय बदलाचे
वारे आणू इच्छित आहे. सुशासन, सुराज्य प्रस्थापित करू इच्छित आहे.
आई जगदंबे, आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश दे, आशीर्वाद
दे .........
डॉं. अविनाश लांडगे
(एक मराठा लाख मराठा)
मो. ८८८८२२१५८६
No comments:
Post a Comment